भारत आणि बांगलादेश या संघात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 3 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. भारताच्या दुसऱ्या डावात बांगलादेशच्या मेहदी हसन याने आपल्या फिरकीच्या बळावर भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. मात्र, श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांच्या जोडीनेे अर्धशतकी भागीदारी केली. त्यांची भागीदारी सामन्याची दिशा बदलवणारी ठरली. हा सामना जिंकल्यावर भारताने ही कसोटी मालिका 2-0ने जिंकली. या सामन्याच्या चौथ्या दिवशी घडलेल्या या 5 घटना चाहत्यांना शेवटपर्यंत लक्षात राहतील.
1. जयदेव उनाडकट थोडक्यात बचावला-चौथ्या दिवलाच्या सुरुवातीला जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) बाद होता होता थोडक्यात बचावला. मेहदी हसन याचा चेंडू त्याच्या पॅडवर येऊन लागला. त्यावर बांगलादेशच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली. मात्र, पंचांनी त्याची अपील फेटाळली. यावर बांगलादेशने रिव्हियूची मागणी केली आणि तो अंपायर्स कॉल असल्याने बचावला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर उनाडकटने जोरादार षटकार लगावत सर्वांना हैराण केले.
2. जयदेव आपल्या या डावात फार मोठी खेळी करु शकला नाही. दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो कट शॉट खेळताना शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्या चेंडूवर पायचीत झाला. पंचांनी त्याला बाद दिले. मात्र, त्याने यावर रिव्हियू घेतला. त्यामध्ये स्पष्ट दिसत होते की चेंडू यष्टींना लागत आहे. अशाप्रकारे भारताला पहिला झटका लागला.
3. 5 विकेट पडल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाजी रिषभ पंत (Rishabh Pant) फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. तणावाच्या परिस्थितीत देखील त्याने आपला नैसर्गिक खेळ सुरु ठेवला. मात्र, तो मोठी खेळी करु शकला नाही. 28व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मेहदी हसन (Mehidy Hasan) याच्या चेंडूवर पायचीत होऊन बाद झाला. त्यानेे 13 चेंडूत 9 धावा केल्या.
4. भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहली याच्या ऐवजी अक्षर पटेल (Axar Patel) चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. तिसऱ्याा दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो 26 धावा करत नाबाद होता. त्याला देखील मेहदी हसन याने तंबूत पाठवले. या डावातील ही त्याची 5वी विकेट होती.
5. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 6 विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी आला. जेव्हा तो फलंदाजी करण्यासाठी मैैदानावर आला तेव्हा भारताची 6 बाद 71 अशी अवस्था होती. भारताला अजूनही जिंकण्यासाठी 74 धावांची गरज होती. त्यानंतर त्याने आर अश्विन (R. Ashwin) सोबत मिळून 71 धावा केल्या आणि भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केला. अय्यर आणि अश्विन अनुक्रमे 29 आणि 42 धावा करत नाबाद राहिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी
VIDEO: सामना जिंकताच अश्विनचा एकच जल्लोष! ड्रेसिंग रूममधील विराट, राहुलची रिऍक्शन व्हायरल