यश धूलच्या (Yash dhull) नेतृत्वाखाली भारतीय १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक स्पर्धेच्या (icc under 19 world cup) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना इंग्लंड संघाविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला ९६ धावांनी धूळ चारली होती. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २९० धावांचा डोंगर उभारला होता. ज्यामध्ये यश धूलने तुफानी शतक झळकावले होते. यासह तो १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला होता.
अंतिम सामन्यात उन्मुक्त चंदचे शतक
उन्मुक्त चंदच्या (Unmukt Chand ) नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक २०१२ स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदने तुफानी शतक झळकावले होते. त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १३० चेंडूंमध्ये १११ धावांची खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला होता. परंतु त्याला भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवता आले नाही. याच कारणास्तव त्याने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो सध्या अमेरिका संघाचे प्रतिनिधित्व करतोय.
विराट ठरला होता पहिला कर्णधार
तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतक झळकावले आहेत.
तसेच २००८ मध्ये झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील एका सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज संघ आमने सामने होते. या सामन्यात विराट कोहलीने ७४ चेंडुंमध्ये १०० धावांची खेळी केली होती. यासह तो आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला होता. या स्पर्धेत विराट कोजलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जेतेपद पटकावले होते.
यश धूलचे तुफानी शतक
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात शतक झळकावताच यश धूलचा विराट कोहली आणि उन्मुक्त चंदच्या यादीत समावेश झाला आहे. त्याने या सामन्यात १३० चेंडूंमध्ये १११ धावांची खेळी केली होती. तो आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी उपलब्ध असणार आहे. त्याची फलंदाजी पाहता त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. या तिन्ही खेळाडूंची खासियत हे तिघेही दिल्लीचे आहेत.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात होणार ९४ सामने, बीसीसीआयची कमाई होणार दुप्पट; खेळाडूंना किती मिळणार?
मोलाचा सल्ला! वर्ल्डकप फायनलपूर्वी भारताच्या ‘यंगिस्तान’ला विराट कोहलीकडून मार्गर्दशन, फोटो व्हायरल