अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने अखेर विजय मिळवला. या सामन्याचा निकाल 40 षटकांच्या खेलानंतर लागणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात 44 षटकांचा खेळ झाला. याआधी अनेकदा सुपर ओव्हरमध्ये सामना निकाली निघताना पाहिले गेले आहे. पण टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुधवारी (17 जानेवारी) पहिल्यांदाच असे झाले की, एका सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळवल्या गेल्या. चला तर जाणून घेऊ सुपर ओव्हरच्या रुपात झालेल्या एकूण चार षटकांचा खेळाविषयी.
अफगाणिस्तान संघ 213 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण 20व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 3 धावा हव्या असताना गुलबादिन नाईब याला दोन धावांवर समाधान मानावे लागले. परिणामी सामना सुपर ओव्हरपर्यंत तानला गेला. सुपर ओव्हरमध्ये पलंदाजी करण्यासाठी अफगाणिस्तान संघाकडून गुलबादिन नाईब आणि मोहम्मद नबी खेळपट्टीवर आले. पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर गुलबदिन दुसऱ्या धावेचा मोह आवरू शकला नाही. पण विराट कोहलीने सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर त्याल धावबाद केले.
सुपर ओव्हल –
षटकातील दुसरा चेंडू मुंकेश कुमार याने मोहम्मद नबीला टाकला. या चेंडूवर नबीने एक धाव घेतली. मुकेशने पुढचा चेंडूर रहमनुल्ला गुरबाझ याला टाकला आणि अफगाणिस्तान संघाला या चेंडूवर चार धावा मिलाल्या. गुरबाझनेही पुढच्या चेंडूवर एक धाव घेऊन नबीला स्ट्राईक दिली. षटकात पाचव्या चेंडूवर नबीने षटकार मारला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर लेग बाय आणि ओव्हरथ्रेच्या चुकीमुले अफगाणिस्तानला 3 धावा मिळाल्या. भारताला आता विजयासाठी 6 चेंडूत 17 धावांचे लक्ष्य होते.
अजमतुल्ला ओमरझाई याला कर्णधाराने चेंडू सोबवला. षटकातील पहिल्या चेंडूवर भारताला लेग बायची एक धाव मिळाली. दुसर्या चेंडूवर यशस्वी जयस्वाल यानेही एक धाव घेतली. स्ट्राईकवर आलेल्या रोहित शर्माने षटकात तिसरा आणि चौथा चेंडू लागोपाट षटकारासाठी खेळला. भारताच्या खात्यात या दोन चेंडूंमध्ये12 धावा जोडल्या गेल्या. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर देखील प्रत्येकी एकएक धाव भारताच्या खात्यात जोडली गेली. सुपर ओव्हर संपल्यानंतर भारताची धावसंख्या देखील 16 होती आणि दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळली गेली.
दुसरी सुपर ओव्हर –
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताला पाच चेंडू खेलायला मिळाले. षटकात चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर रिंकू सिंग आणि संजू सॅमसन यांनी विकेट्स गमावल्या. त्याआदी पहिल्या आणि दुसऱ्या चेेंडूवर रोहिते षटकार आणि चौकार मारला होता. भारताने या षटकात 11 धावा केल्या. 12 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी खेळपट्टीवर आलेले अफगाणी फलंदाज अवघ्या 3 चेंडूंचा सामना करू शकले. रवी बिश्नोई याने षटकातील पहिल्या चेंडूवर रवी बिश्नई याला, तर तिसऱ्या चेंडूवर रहमनुल्ला गुरबाज याला झेलबाद केले. षटकातील ही दुसरी विकेट असल्यामुळे भारताने 11 धावा राखून विजय मिळवला. (Thrill of double super over in India vs Afghanistan match)
40 षटकांच्या खेळानंतर सामना टाय –
तत्पूर्वी भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. 20 षटकांचा खेळ झाल्यानंतर भारताने 4 विकेट्सच्या नुकसानावर 212 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ देखील 20 षटकांमध्ये 212 धावांवर्यंतच मजल मारू शकला. रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांच्यात 190* धावांची सर्वोत्तम टी-20 भागीदारी पार पाडली. रोहित शर्मा याने 69 चेंडूत 121 धावांची खेळी केली. टी-20 कारकिर्दीतील रोहित शर्माचे हे पाचवे शतक असून, यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. रिंकू सिंग यानेही 39 चेंडूत 69 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. अफगाणिस्तानसाठी रहमनुल्ला गुरबाज, अब्राहिम झद्रान आणि गुलबादिन नाईब यांनी अर्धशतकी खेळी केली. पण आपल्या संघालाविजय मिळवून देऊ शकले नाहीत.
महत्वाच्या बातम्या –
Hero No. 1 । विराटच्या गळ्यात पडला आणि रातोरात स्टार बनला! चाहत्याचा गावकऱ्यांकडून सन्मान
‘अरे आधीच नावावर दोन शुन्या लागले आहेत…’, लाईव्ह सामन्यात रोहित आणि पंचांतील चर्चा व्हायरल