जेव्हा-जेव्हा विश्वचषक फायनलचा सामना होतो, तेव्हा-तेव्हा विराट कोहली टीम इंडियाचा तारणहार म्हणून समोर येतो. टी20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्येही कोहलीनं आपल्या विराट खेळीनं सर्व टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
आतापर्यंत या विश्वचषकात विराट कोहलीनं 7 डावात केवळ 75 धावा केल्या होत्या. मात्र आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत त्यानं 59 चेंडूत 76 धावांची खेळी करत भारताला संकटातून वाचवलं. 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 34 धावा होती, जी त्यानं बांगलादेशविरुद्ध सुपर-8 सामन्यात केली होती. परंतु कर्णधार रोहित शर्मानं सुरुवातीपासूनच त्याच्यावर विश्वास दाखवला, ज्याचं फळ आता मिळालं आहे.
इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत 68 धावांनी विजय मिळविल्यानंतर रोहित शर्मानं, विराट हा मोठा खेळाडू असून तो संघाचा महत्त्वाचा दुवा असल्याचं म्हटलं होतं. विराट फायनलमध्ये मोठी खेळी खेळेल, असंही तो म्हणाला होता. हे सर्व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात खरं ठरलं. 76 धावांसह कोहली टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
विराट कोहली 2011 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळला होता. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यानं श्रीलंकेविरुद्ध 35 धावांची इनिंग खेळली होती. मात्र, अंतिम सामन्यातील गौतम गंभीरची 97 धावांची खेळी आणि महेंद्रलिंह धोनीची 91 धावांची खेळी सर्वाधिक लक्षात राहते. परंतु वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाल्यानंतर विराटनं 35 धावांची महत्त्वाची खेळी खेळून भारतीय संघाला सावरलं होतं. त्यानंतर विराट कोहलीनं 2014 टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्येही अर्धशतक झळकावले होतं. त्यानं 58 चेंडूत 77 धावांची खेळी केली होती.
विराट कोहलीला विक्रमांचा बादशाह उगाच म्हटलं जात नाही. विराट हा असा खेळाडू आहे, ज्यानं आतापर्यंत खेळलेल्या सर्व टी20 विश्वचषक फायनलमध्ये 50 धावा केल्या आहेत. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्यानं 63 चेंडूत 54 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे विराटनं विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम कायम ठेवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीनं वाचवली भारतीय संघाची इज्जत! आफ्रिकेसमोर 177 धावांचं आव्हान
सर्वात महत्त्वाच्या सामन्यात ‘हिटमॅन’ फ्लॉप, भारतीय संघाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगणार का?
केशव महाराजचा भारताला दे धक्का! एकाच षटकात भारताला आणलं बॅकफूटवर