भारत आणि हॉंगकॉंग यांच्यातील सामना बुधवारी (31 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर खेळला गेला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली फॉर्ममध्ये दिसला. त्याने आपले 31 वे टी20 अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकाच्या दरम्यान तीस धावांचा टप्पा पार करताच, रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मागे टाकले.
भारताच्या पहिल्या गड्याच्या रूपात रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या विराटने या सामन्यात 44 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या. विराटचे शेवटचे अर्धशतक तब्बल 194 दिवसांपूर्वी 18 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीज संघाविरुद्ध आले होते.
या खेळीदरम्यान विराटने 46 व्यांदा 30 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला. याबाबतीत त्याने रोहित शर्माला मागे टाकले. यापूर्वी रोहित व विराट यांनी प्रत्येकी 45 वेळा 30 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी अनुभवी सलामीवीर शिखर धवन आहे. शिखरने आत्तापर्यंतच्या आपल्या टी20 कारकिर्दीत 28 वेळा ही कामगिरी केलीये. मात्र, सध्या शिखर भारतीय संघाचा भाग नसल्याने, तो या यादीत आणखी पुढे जाण्याची शक्यता कमी आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 20 षटकांमध्ये 192 धावा उभारल्या. विराटसह सूर्यकुमार यादव यानेदेखील तुफानी नाबाद अर्धशतक साजरे केले. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत अ गटात आघाडी घेतली असून, हॉंगकॉंगविरूद्ध विजय मिळवत सुपर फोर मधील आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022 | पाकिस्तानविरुद्धचा मॅचविनर हार्दिक संघातून बाहेर, पंत करतोय पुनरागमन
खासच! सचिन एवढ्ढाच बाप विक्रम केलाय रोहितने, टी२०त केलाय कहर कारनामा
हाँगकाँगच नाणं खणकलंय! नाणेफेक जिंकत घेतलाय गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11