लंडन येथील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर 444 धावांचे कठीण आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 164 अशी मजल मारली. भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली हा नाबाद 44 धावा काढून मैदानावर आहे. पाचव्या दिवशी भारतीय संघ व चाहत्यांना त्याच्याकडूनच सर्वाधिक अपेक्षा असतील. विराटची आतापर्यंतची कसोटी क्रिकेटमधील पाचव्या दिवशीची कामगिरी देखील त्याची महानता सिद्ध करणारी आहे.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली याचे चौथ्या क्रमांकावर खेळपट्टीवर आगमन झाले. त्याने सुरुवातीपासूनच अतिशय आत्मविश्वासाने फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना कोणतीही संधी न देता त्याने आपला डाव पुढे नेला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत 60 चेंडूवर 44 धावा काढून तो नाबाद आहे. यात त्याने सात चौकार मारले.
पाचव्या दिवशी विराटकडून यापेक्षा सरस कामगिरीची अपेक्षा सर्वांना असणार आहे. त्याने आतापर्यंत पाचव्या दिवशी फलंदाजी करताना 14 डावांमध्ये 69 पेक्षा जास्त सरासरीने 696 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने पाचव्या दिवशी फलंदाजी 2014 मध्ये ऍडलेड कसोटीत 141 धावा ठोकलेल्या. त्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या दिवशी 105 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आलेली. तर 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे त्याच्या बॅटमधून 107 धावा निघाल्या होत्या. त्यामुळे या अंतिम सामन्यात देखील त्याने अशी शतकी खेळी करावी अशी अपेक्षा भारतीय चाहते व्यक्त करत आहे.
भारतीय संघाला अखेरच्या दिवशी 280 धावा काढाव्या लागतील. त्यामुळे भारतीय संघाची मदार प्रामुख्याने विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा व शार्दुल ठाकूर यांच्यावर असेल.
(Virat Kohli Fifth Day Stats In Test Cricket Ahead WTC Final Last Day)
महत्वाच्या बातम्या –
रहाणे-विराटच्या खांद्यावर भारताला डब्ल्यूटीसी चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी! शेवटचा दिवस निर्णायक
कसोटीत ऑस्ट्रेलियाला चोपणाऱ्या 5 भारतीयांच्या यादीत विराटचाही समावेश, पण ‘किंग’चा नंबर कितवा?