---Advertisement---

‘विराटला विश्रांतीची गरज नाही’, कोहलीच्या बालपणीच्या प्रशिक्षकाकडून पाठराखण

On: गुरूवार, जुलै 7, 2022 9:35 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब पट्ट्यावर आहे. मागच्या अडीच वर्षांपासून विराट अपेक्षित प्रदर्शन करत नसल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातही विराट अपयशी ठरला. अशात त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा विराटच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेचा शेवटचा सामना एजबस्टनमध्ये खेळला गेला. उभय संघातील हा सामना इंग्लंडने ७ विकेट्स राखून जिंकला आणि कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीवर सोडवली. विराट कोहली (Virat Kohli) या सामन्याच्या पहिल्या डावात ११, तर दुसऱ्या डावात २० धावा करून बाद झाला. विराटला फॉर्ममध्ये पुनरागमन करण्यासाठी अनेक दिग्गजांनी मोठी विश्रांती हा एकमेव पर्याय सुचवला आहे, परंतु त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांच्या मते विराटला कसल्याही विश्रांतीची गरज नाहीये.

राजकुमार शर्मा म्हणाले की, “हे पाहा मी समजू शकतो की, विराट मोठ्या काळापासून चांगले प्रदर्शन करू शकला नाहीये, पण प्रत्येक चांगल्या खेळाडूसोबत असे होतेच. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ज्या चेंडूवर त्याने स्वतःची विकेट गमावली, तो चेंडूच अप्रतिम होता आणि कोणताही फलंदाज त्या चेंडूवर बाद झाला असता. विराटला विश्रांती घेण्याची काहीच गरज नव्हती. कारण तो पूर्णपणे ठीक आहे.”

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील पहिले चार सामना मागच्या वर्षी खेळले गेले होते, पण कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे मालिकेतील शेवटचा सामना स्थगित करावा लागला होता. हाच स्थगित केला गेलेला सामना यवर्षी खेळला गेला. उभय संघातील कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-२० आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.

उभय संघातील टी-२० मालिका गुरुवारी (७ जुलै) सुरू होणार असून मालिकेतील शेवटचा सामना १० जुलै रोजी खेळला जाईल. त्यानंतर उभय संघातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १२ जुलै ते १७ जुलैदरम्यान खेळली जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘आयपीएल हंगाम संपूर्ण खेळता, पण भारताकडून खेळताना विश्रांती घेता’, रोहित-विराटवर चाहत्यांचा रोष

इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत ‘या’ तिघांची अग्निपरीक्षा, संघात कायम राहण्यासाठी चांगले प्रदर्शन गरजेचे

कसोटी संपली, आता इंग्लंडविरुद्धच्या टी२० आणि वनडे मालिकेसाठी भारत तयार; पाहा पूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---