---Advertisement---

अयोग्य खेळाडूंना सपोर्ट करत होता विराट; माजी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा

On: शुक्रवार, सप्टेंबर 18, 2020 11:22 AM
---Advertisement---

मुंबई । विराट कोहली हा 60 टक्के विजयांसह कसोटी क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. वनडे सामन्यातही त्याच्या विजयाची टक्केवारी काही कमी नाही, परंतु इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चे नेतृत्व करताना तो चांगला निकाल देऊ शकला नाही. आरसीबीने अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही. तथापि, त्यांनी 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरी गाठली. अशा परिस्थितीत आरसीबीच्या माजी प्रशिक्षकाने विराट कोहलीच्या आरसीबीला ट्रॉफी न मिळण्यामागील कारण सांगितले.

2009 आणि 2014 मध्ये संघाचे प्रशिक्षक असलेले रे जेनिंग्सने क्रिकेट डॉट कॉमला सांगितले की, “जर मला मागे वळून पाहायचे असेल तर मी असे म्हणेन की कोणत्याही संघात 25-30 खेळाडू असतात. सर्व खेळाडूंना पाहणे प्रशिक्षकाचे कर्तव्य आहे. पण विराटची स्वतःची वेगळी योजना होती. काही वेळा तो संघात एकटाच दिसला, कारण त्याने अपात्र खेळाडूंना पाठिंबा दिला. परंतु आपण यासाठी कोहलीला दोष देऊ शकत नाही.  काही खेळाडूं विशिष्ट परिस्थितीत गोलंदाजी किंवा फलंदाजी करावी अशी माझी इच्छा होती, परंतु त्यांची वेगळी योजना होती.”

जेनिंग्सच्या प्रशिक्षण कालावधी दरम्यान आरसीबीने सर्वोत्कृष्ट खेळाडू पाहिले आणि संघ दोन वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. ते पुढे म्हणाले, “आयपीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा वेगळा आहे. सहा आठवड्यांत काही खेळाडूंची निवड केली जाते. मी प्रशिक्षक होतो, तेव्हा मला असे वाटत होते की, काही खेळाडूंनी जास्त खेळायला हवे होते, परंतु कोहलीचे वेगळे मत होते. पण या सर्व भूतकाळाच्या गोष्टी आहेत, आता आरसीबीने जेतेपद मिळवताना पहायचे आहे.”

“आपण हे विसरू नये की आयपीएलमधील सामने खूप कमी फरकाने जिंकले किंवा हरले जातात. येथे लिलावही खूप महत्वाचा आहे,” असेही रे जेनिंग्स यांनी सांगितले.

विराट कोहलीची प्रशंसा करताना जेनिंग्स म्हणाले,” विराट कोहलीकडे अविश्वसनीय बुद्धी आहे. त्याचे मानके खूप मोठे आहेत. पण काही वेळा कोहलीला मार्गदर्शनासाठी एका मार्गदर्शकाची गरज आहे. त्याला एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून पाहिले की छान वाटते. त्याचा उत्कृष्ट खेळ अजून बाकी आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---