---Advertisement---

विराट आता आनंदाने IPL सोडू शकतो, सहवाग यांच्या वक्तव्याने चाहत्यांमध्ये खळबळ!

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangaluru) संघाने 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अठराव्या हंगामाची ट्रॉफी त्यांच्या नावावर केली. यासोबतच किंग कोहलीचे (King Kohli) स्वप्न सुद्धा पूर्ण झालं. विराटने आयपीएल 2025 मध्ये खूप शानदार प्रदर्शन केलं होतं, त्याने आता आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आता भारतीय संघाचे माजी दिग्गज सलामी वीर फलंदाज वीरेंद्र सहवाग (Virendra sehwag) यांनी विराट कोहलीच्या आयपीएल रिटायरमेंट विषयी मोठं विधान दिलेलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज विराट कोहलीच स्वप्न अखेर पूर्ण झालं. दिग्गज वीरेंद्र सहवाग यांनी क्रिकबजशी बोलताना असे म्हटले, विराट कोहलीच्या मनावरचं ओझं कमी झालं असेल आणि त्यामुळे आता तो कदाचित आयपीएल आनंदाने सोडू शकतो. तसेच याविषयी कदाचित तो मोठा निर्णय घेऊ शकतो. एक खेळाडू ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळतो, पैसे येत जात असतात. पण ट्रॉफी जिंकणे सोपे नसते आणि जरी विराट कोहलीची प्रतीक्षा संपली असली, तरी देखील त्याने आत्तापर्यंत त्याच्या बाजूने पूर्ण पणे मजबूत योगदान दिलेले आहे.

भारतीय सुपरस्टार विराट कोहलीने टी20 विश्व कप 2024 नंतर टी20 मधून निवृत्ती जाहीर केली. तसेच 12 मे रोजी त्याने कसोटी क्रिकेट मधून देखील निवृत्ती जाहीर केली. आता विराट फक्त वन-डे फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी खेळत आहे. यामुळे चाहत्यांना अशी आशा आहे की, विराटने 2027 वर्ल्डकप खेळावा. तसेच 2027 पर्यंत आयपीएलमध्ये आरसीबी संघाचा तो भाग राहू शकतो. सध्या तो आरसीबीसाठी एक खूप महत्त्वाचा खेळाडू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---