भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. कसोटी व वनडे मालिका जिंकल्यानंतर टी20 मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले. त्यानंतर भारताचा कर्णधार बनलेल्या हार्दिक याच्या संघातील भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
मागील वर्षी झालेल्या विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघाचे नेतृत्व टी20 क्रिकेटमध्ये हार्दिक करताना दिसतोय. अधिकृतपणे संघाचा कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती झाली नसती तरी, पुढील टी20 विश्वचषकात तोच भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या पाच सामन्यांच्या मालिकेत देखील त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आलेले. मात्र, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली कारकीर्द सुरू केलेल्या हार्दिकला कोणती भूमिका द्यायची याबाबत, संघ व्यवस्थापन निश्चितता ठेवताना दिसत नाही.
हार्दिक यावर्षी भारतासाठी 8 टी20 सामने खेळला असून यामध्ये त्यांनी केवळ 154 धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये तो एका ठराविक क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला नाही. चार-पाच तर कधी सहा अशा क्रमांकावर त्याने फलंदाजी केली. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघासाठी खेळताना तो तिसऱ्या अथवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्यामुळे त्याच्या फलंदाजीचा क्रम नक्की काय याचे उत्तर संघ व्यवस्थापनाला द्यावे लागेल.
फलंदाजीनंतर गोलंदाजीतही हार्दिक संघाचा प्रमुख गोलंदाज आहे की अष्टपैलू याचे देखील उत्तर कोणालाही मिळाले नाही. हार्दिक अनेकदा पहिले अथवा दुसरे षटक टाकताना दिसतो. यामध्ये तो बळी मिळवण्यात यशस्वी ठरत असला तरी, काही वेळा प्रमुख गोलंदाज आपल्या वाटेची पूर्ण षटके टाकत नाहीत.
याव्यतिरिक्त त्याच्या नेतृत्वात देखील अनुभवाची कमतरता दिसून येते. त्यामुळे हार्दिक सर्व भूमिका योग्यरीतीने पार पाडू शकतो का असा प्रश्न विचारला जात आहे.
(What Is Hardik Pandya Main Role In Team India Captain Batter Or Bowler)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING! न्यूझीलंडच्या दिग्गजाने जॉईन केली ऑरेंज आर्मी, हैदराबाद फ्रँचायझीकडून ब्रायन लारा करारमुक्त
BREAKING: अखेर पाकिस्तानच ठरलं! वर्ल्डकपसाठी भारतात येण्यास सरकारने दिली परवानगी