---Advertisement---

आयपीएल शिफ्ट होणार की थांबणार? बीसीसीआयने तयार केला प्लान बी, सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

---Advertisement---

गुरुवार रात्री पश्चिम सीमेवर लाईटमध्ये व्यथ्यय आल्याने आयपीएल सामन्यावर खूप मोठा परिणाम झाला. धर्मशाला स्टेडियममध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सुरू असलेला सामना 10.1 षटकानंतर रद्द करण्यात आला. हा निर्णय पठाणकोट पासून 90 किलोमीटर दूर असलेल्या सीमेवरून हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. यानंतर भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाने स्पर्धेच्या भविष्यावर एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.

रात्री 9.30 वाजता हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनला एका वरिष्ठ क्रिकेट अधिकाऱ्याचा फोन आला, त्यानंतर स्टेडियमच्या लाईट टॉवर बंद करण्यात आल्या आणि संपूर्ण मैदानात अंधार पसरला. प्रेक्षकांना तात्काळ स्टेडियम मधून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले. आयपीएल चेअरपर्सन अरुण धुमळ यांना मैदानातून दर्शकांना बाहेर जाण्याचे आवाहन करताना पाहण्यात आले. दोन्ही संघांना तात्काळ बसमध्ये बसवून हॉटेलवर पाठवण्यात आले.

एका खेळाडूने सांगितले, आम्हाला पठाणकोटच्या हल्ल्याची सूचना मिळाली. आम्हाला तुरंत हॉटेलवर परत जाण्यास सांगण्यात आले. दिल्ली कॅपिटल्स, पंजाब संघ बस मधून हॉटेलकडे रवाना झाले. काही विदेशी खेळाडू काळजीत होते आणि काही खेळाडू त्यांच्या देशात परत जाण्याचा विचार करत आहेत.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले, आम्ही परिस्थितीवर कडक लक्ष ठेवून आहोत आणि सरकारकडून सल्ला घेत आहोत. आम्ही आज आयपीएलच्या पुढच्या स्पर्धेवर महत्त्वाचा निर्णय घेणार आहोत. परिस्थिती प्रत्येक दिवशी बदलत चालली आहे. आम्ही सरकारच्या निर्देशांचे पालन करून आणि सर्वांच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेऊ. सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, खेळाडू, प्रशिक्षक आणि सर्व लोक सुरक्षित असणे.

सूत्रांच्या माहितीनुसार बीसीसीआय सर्व पर्यायांवर विचार करत आहे, ज्यामुळे आयपीएल स्पर्धा थांबणार की स्पर्धेचे ठिकाण बदलेल हे समजेल. प्रत्येक क्षेत्रांचे विमानतळ बंद असल्याकारणाने बीसीसीआय बाकीच्या योजनांवर काम करत आहे. शुक्ला यांनी सांगितले, आम्ही प्रयत्न करत आहोत की संघ ट्रेनच्या मदतीने दिल्ली पोहोचेल. बीसीसीआय सर्वांच्या सुरक्षेसाठी जमेल तो प्रयत्न करत आहे.

फ्रेंचाईजी विदेशी खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आवाहन करत आहे आणि त्यांना हे देखील आश्वासन दिले जात आहे की, जर कोणाला त्यांच्या देशात परत जायचे असेल, तर त्यांची जाण्याची सोय केली जाईल. बीसीसीआय बाकीच्या क्रिकेट बोर्डाना सुद्धा परिस्थितीची माहिती देईल आणि त्यांच्या खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रथम विचार करेल.

या आधी जयपुरच्या एसएमएस स्टेडियम जेथे एका आठवड्यानंतर सामना होणार होता, तिथे ई-मेलच्या माध्यमातून बॉम्बची धमकी देण्यात आली. जयपुर सिटीचे डीसीपी साउथ बलराम यांनी सांगितले की, या विषयात गोंधळ करण्यात आला आहे आणि पोलीस यंत्रणा इमेलचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहे.

ही पहिली वेळ नाही, जेव्हा आयपीएल स्पर्धेच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पण यावेळी परिस्थितीच्या गंभीरतेने स्पर्धेवर मोठा परिणाम दिसून येत आहे. प्रेक्षक, खेळाडू आणि सर्व लोकांचे लक्ष बीसीसीआयच्या पुढच्या निर्णयावर टिकून असेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---