आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोबरला सूरू होणार आहे आणि विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला असणार आहे. विश्वचषकानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंड संघ भारतात तीन टी२० सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याबाबत नुकताच त्याच्या बोटाच्या दुखापतीतून सावरलेला न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवेने त्याचे मत स्पष्ट केले आहे.
त्याच्यामते भारतामध्ये जाऊन त्यांना पराभूत करणे हे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करण्यापेक्षा जास्त कठीण असणार आहे.
जून महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने-सामने आले होते. भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला होता आणि न्यूझीलंडने या स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते.
याच पार्श्वभूमीवर कॉनवे या दौऱ्याविषयी बोलताना म्हटला आहे की, “निश्चित हे मोठे लक्ष्य आहे, जे आम्ही मिळवू इच्छित आहोत. भारताला त्यांच्या घरच्या परिस्थितीत हरवणे इंग्लंडमध्ये हरवण्यापेक्षा मोठे आव्हान आहे. ही जागतिक कसोटी अजिंकपदाच्या विजयासारखी मोठी नसली तरी ही महत्वाची संधी आहे. जिंकण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि स्वत्त:ला सिद्ध करण्यासाठी एक महत्वाची मालिका आहे.”
भारताच्या दौऱ्यावर फिरकी गोलंदाजानांनी अनुकूल खेळपट्टीमुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मानसिक स्वरूपात तंदुरुस्त असने गरजेचे असल्याचेही कॉनवेने सांगितले आहे. तो पुढे म्हणाला, “उपमहाद्वीपाचा दौरा करणे आणि तेथे फिरकी घेणाऱ्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी तुम्हाला मानसिक रूपात मजबूत असावे लागणार आहे. तुम्हाला तुमच्या बचावावर विश्वास पाहिजे आणि तुमच्याकडे ती पद्धत पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला धावा करता येतील.”
कॉनवे पुढे म्हणाला, “जर तुम्ही धावा बनवण्याबाबत विचार करत नसाल, तर तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये राहणार नाही. तुम्हाला रणनीती तयार करावी लागेल आणि जेवढे शक्य असेल त्याच्यावर कायम राहावे लागेल, तरीदेखील हे आव्हानात्मक असेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
टायगर vs लायगर! जेव्हा युवराज सिंगने जंगलातल्या वाघासोबत केले ‘टग ऑफ वॉर’
जरा अजबच आहे जयस्वालच्या यशाचे रहस्य, कर्णधार म्हणतो…
आयपीएल २०२१ मध्ये षटकार मारत संघाला विजय मिळवून देणारे ६ क्रिकेटर