आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे जिथे कधीही काहीही बदल पाहायला मिळतो. आयपीएलमध्ये आतापर्यंत फलंदाजांनी आपलं वर्चस्व गाजवलं आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त दडपणाखाली असतो तो म्हणजे कर्णधार. या परिस्थितीत संघाचे नेतृत्व तर असतेच सोबत उत्तम खेळी करून संघाला विजय मिळवून द्यावे लागते. ज्या खेळाडूंमध्ये असे कौशल्य आहे त्यालाच कर्णधारपद दिले जाते. रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांची गणना आयपीएलच्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते आणि हे मैदानावर शांत राहतात. या शांततेच्या मागे त्याचे धोरण आणि दबाव सहन करण्याची क्षमता आहे. या लेखामध्ये आयपीएलमध्ये कर्णधार होण्यासाठी सक्षम असलेल्या दोन खेळाडूंचा उल्लेख आहे.
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सक्षम असलेले २ खेळाडू
हार्दिक पंड्या
मुंबई इंडियन्सचा हा अष्टपैलू खेळाडू मैदानात निर्भयतेने खेळतो. फलंदाजी आणि गोलंदाजीचे कौशल्य या खेळाडूमध्ये आहे तसेच तो क्षेत्ररक्षणातही उत्तम आहे. पंड्याने प्रत्येक क्षेत्रात आपली जबरदस्त कामगिरी दाखवून स्वतः ला सिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हार्दिक पंड्या आयपीएलच्या माध्यमातूनच आला आहे. मुंबई इंडियन्समध्ये त्याने बरीच वर्ष रोहित शर्माचे नेतृत्त्व पाहिले आहे तसेच भारतीय संघात तो एमएस धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वात देखील खेळला आहे. त्याने या सर्व गोष्टी मुंबई इंडियन्स संघात खेळून शिकल्या आहेत, त्यामुळे कदाचित त्याला कर्णधारपद सांभाळताना जास्त त्रास होणार नाही.
मयंक अगरवाल
आयपीएलमध्ये मयंक अगरवाल किंग्स इलेव्हन पंजाब संघातून खेळात आहे आणि तो जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. घरगुती क्रिकेटचा खूप अनुभव असणाऱ्या मयंकने कसोटी क्रिकेटमध्येही धमाकेदार सुरुवात केली. त्याला कोणतीही गोष्ट समजून घेण्याची आणि शिकण्याची इच्छा आहे. जर त्याला आयपीएलमध्ये कर्णधार केले गेले, तर तो स्वतःला सिद्ध करू शकतो. संघामध्ये समन्वय राखण्यास तो सक्षम आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ३ सामने खेळले असून २२१ धावा केल्या आहेत. त्यात त्याने १ अर्धशतक आणि १ शतक ठोकले आहे.