पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आता 1-1 बरोबरी झाली आहे. मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान पाकिस्तानला अखेर घरच्या मैदानावर कसोटी विजय मिळण्यात यश मिळाले. 1338 दिवसांनंतर घरच्या मैदानावर पाकिस्तानचा हा पहिला कसोटी विजय आहे.
या मैदानावरील मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा वाईट रित्या पराभव केला होता. तर आता या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानसाठी केवळ दोन गोलंदाजांनी 20 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 52 वर्षांनंतर हे घडले. पहिल्या डावात साजिद खानने सात, तर नोमान अलीने तीन बळी घेतले. तर दुसऱ्या डावात साजिदने दोन तर नोमान अलीने आठ बळी घेतले. अशा प्रकारे या दोन गोलंदाजांनी मिळून इंग्लंडच्या 20 विकेट्स घेतल्या. त्यांनी पाकिस्तानला हा खास कसोटी विजय मिळवून दिला. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा हा पहिला कसोटी विजय आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये याआधी सहावेळा हा पराक्रम केला गेला आहे. कसोटीत दोन गोलंदाजांनी मिळून 20 बळी घेण्याची ही सातवी वेळ होती. 1902 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात प्रथमच असे घडले. नोबल आणि ट्रेम्बले या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पहिल्यांदाच ही कामगिरी केली होती. त्यानंतर 1909 मध्ये इंग्लंडच्या ब्लिथ आणि हर्स्ट यांनी मिळून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली. 1910 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या व्लॉगर आणि फॉकनर यांनी मिळून इंग्लंडकडून 20 विकेट घेतल्या होत्या. 1956 मध्ये इंग्लंडच्या जिम लेकर आणि टी लॉक यांनी मिळून ऑस्ट्रेलियाकडून 20 विकेट घेतल्या होत्या. 1956 मध्येच पाकिस्तानच्या महमूद आणि खान मोहम्मद यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत 20 विकेट्स घेतल्या होत्या आणि 1972 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बी मॅसी आणि डेनिस लिली यांनी मिळून इंग्लंडसाठी एकूण 20 विकेट घेतल्या होत्या.
या कसोटी सामन्यापूर्वी, पाकिस्तानने सलग 11 घरच्या कसोटी सामन्यांपैकी एकही सामना जिंकलेला नव्हता. याशिवाय नोमान अलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. नोमानने दुसऱ्या डावात 46 धावांत आठ गडी बाद केले. मुलतान क्रिकेट मैदानावरील कोणत्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम कसोटी गोलंदाजी आहे.
हेही वाचा-
पहिल्या डावानंतर न्यूझीलंडकडे मोठी आघाडी, टीम इंडिया बॅकफूटवर
भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
भारत-न्यूझीलंड कसोटीत रवींद्रनं ठोकलं शतक, 12 वर्षांनंतर झाला हा पराक्रम!