मुंबई । 2007 साली क्रिकेटच्या इतिहासात टी -20 विश्वचषक प्रथमच सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेत प्रथमच झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद जिंकले.
दुसरीकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अझर महमूदने 2007 मध्ये झालेल्या या स्पर्धेची आठवण सांगत म्हणाला की, “पहिला टी 20 विश्वचषक भारताने जिंकला. त्यानंतर जागतिक क्रिकेटमध्ये अनेक बदल घडून आले.”
2007 च्या टी 20 विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयाने आयपीएलचा जन्म झाला. जी सध्या जगातील सर्वात मोठी लीग आहे. विस्डेनने द ग्रेटेस्ट रिव्हलरी पॉडकास्टमध्ये बोलतांना तो म्हणाला की, ”टी 20 विश्वचषक होण्यापूर्वी भारत टी 20 साठी फारसा उत्सुक नव्हता. त्यांचे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर अधिक लक्ष होते. टी 20 विश्वचषक जिंकणे ही भारतासाठी मोठी गोष्ट होती, ज्यामुळे आयपीएलचा जन्म झाला.”
यावेळी, महमूदने विश्वचषक फायनलमध्ये कर्णधार मिसबाह-उल-हकचा शेवटचा शॉट आठवला. यावर बोलताना महमूद म्हणाला की, “मिस्बाह-उल-हकने हवे तर समोर षटकार मारून सामना जिंकू शकला असता परंतु त्याच्या चुकीच्या शॉटने संघाचा पराभव झाला.”
तो म्हणाला, ”दुर्दैवाने पाकिस्तान पराभूत झाला. मिसबाह शेवटपर्यंत चांगला खेळत होता, तो त्या स्कूप शॉट ऐवजी समोर मारून षटकार ठोकला असता, परंतु तो स्कूपसाठी गेला. जेव्हा मी हे पाहिले तेव्हा मी माझ्या पलंगावर उडी मारली परंतु जेव्हा तो झेल पकडला, तेव्हा मी काय होत आहे असे स्वत:लाच म्हणालो. क्रिकेट, विशेषत: भारतीय क्रिकेटसाठी हा एक उत्तम सामना होता. तेथून एक महान कर्णधार धोनी उदयास आला. त्याने भारतीय क्रिकेटमधील मानसिकतेव्यतिरिक्त बर्याच गोष्टी बदलल्या, ज्याचे श्रेय त्यालाच जाते.”
महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानच्या संघाला शेवटच्या षटकात 13 धावांची आवश्यकता होती, ते षटक जोगिंदर शर्माने फेकले. जोगिंदरने ओव्हरचा पहिलाच चेंडू व्हाईड फेकला आणि त्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव टाकला. दुसर्या चेंडूवर मिसबाहने षटकार मारला. पुढच्या 4 चेंडूंत पाकिस्तानच्या संघाला 6 धावांची आवश्यकता होती परंतु मिसबाह स्कूप शॉट खेळायला गेला आणि श्रीसंतने फाईन लेगवर तो झेल घेतला.
टी -20 विश्वचषकात एमएस धोनी याच्या नेतृत्वात युवा भारतीय संघाने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पाच धावांनी पराभूत केले होते.