आयपीएल म्हटले की सर्वांना पहिल्यांदा आठवते ती गोष्ट म्हणजे चौकार, षटकारांची आतिषबाजी. आयपीएलमध्ये नेहमीच फलंदाज वेगवेगळे विक्रम करत असतात. पण यातीलच एक नकोसा विक्रम म्हणजे सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणे.
आपण या लेखात आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणाऱ्या पहिल्या ३ खेळाडूंचा आढावा घेणार आहोत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होणारे ३ क्रिकेटपटू –
३. पियूष चावला – चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी ६.७५ कोटी रुपयांना पियूष चावलाला खरेदी केले होतेे. तो आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १५७ सामने खेळला आहे. तसेच तो जरी प्रामुख्याने गोलंदाज असला तरी अनेकदा त्याने चांगली फलंदाजी प्रदर्शनही केले आहे. त्याने ५८४ धावा केल्या आहेत. पण याबरोबरच तो १२ वेळा आयपीएलमध्ये शून्यावर बादही झाला आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे पियूष चावला व्यतिरिक्त मनिष पांडे, अंबाती रायडू, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा हे खेळाडू देखील आयपीएलमध्ये १२ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. मनिष पांडे १३० सामने, रोहित १८८ सामने, रायडू १४७ सामने आणि गौतम १५४ सामने आयपीएलमध्ये खेळला आहे.
२. पार्थिव पटेल – यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १३९ सामन्यात १३ अर्धशतकांसह २८४८ धावा केल्या आहेत. पण याचबरोबर तो १३ वेळा आयपीएलमध्ये शून्यावरही बाद झाला आहे.
१. हरभजन सिंग – आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा शून्य धावेवर बाद होण्याच्या यादीत हरभजन सिंग अव्वल क्रमांकावर आहे. तो आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १६० सामन्यात खेळला असून यात तो १३ वेळाच शून्य धावेवर बाद झाला आहे. पण याबरोबरच त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ८२९ धावाही केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.
हरभजन २०१७ पर्यंत मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळला. त्यानंतर २०१८ पासून तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
८ तासांत कसोटीत २७० पेक्षा जास्त धावा करणारे ४ क्रिकेटपटू
पृथ्वी शाॅ म्हणतो, या फलंदाजाबरोबर सलामीला फलंदाजीला जरा जास्तच मजा येते