आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांबद्दल बोलताना चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नाव प्रथम घेतले जाते. चेन्नई सुपर किंग्ज संघाने ३ वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. जरी मुंबई इंडियन्सने ४ वेळा विजेतेपद जिंकले असले, तरी चेन्नई सुपर किंग्जने देखील ३ वेळा विजेतेपद जिंकून प्रत्येक मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे.
आयपीएलच्या कोणत्याही मोसमात, विजेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून चेन्नई सुपर किंग्जचे नाव नेहमीच घेतले जाते. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते आपल्या खेळाडूंचे फारसे बदल करीत नाहीत.
आयपीएलमधील मोठ्या यशामुळे सीएसकेच्या संघात स्थान मिळणे फार कठीण आहे. एखाद्या खेळाडूला खेळायला संघात स्थान मिळालं असलं तरी, आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याला सातत्याने चांगले प्रदर्शन करावे लागते. चेन्नई सुपर किंग्जच्या अंतिम अकरामध्ये सातत्य टिकविण्यासाठी खेळाडूला जबरदस्त कामगिरी करावीच लागते. कारण बाहेर बेंचवर बरेच चांगले खेळाडू बसलेले असतात.
या लेखात अशा ३ भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, जे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून फक्त १ सामना खेळू शकले.
चेन्नई सुपर किंग्जकडून फक्त १ सामना खेळलेले हे ३ भारतीय खेळाडू
१. विजय शंकर (Vijay Shankar)
२०१४ च्या आयपीएल लिलावात विजय शंकरला चेन्नईने खरेदी केले होते. पहिल्या नऊ सामन्यांपैकी सात सामने जिंकून सीएसकेने त्या हंगामात चांगली सुरुवात केली. परंतु त्याच्या संघामध्ये अडचण अशी होती की ११ खेळाडूंपैकी त्याच्याकडे फक्त पाच गोलंदाजीचे पर्याय होते. खालच्या क्रमांकावर फलंदाज मिथुन मनहासच्या जागी सीएसकेने विजय शंकरला संधी देण्याचा निर्णय घेतला, पण हे पाऊल फारसे यशस्वी ठरले नाही.
विजय शंकरला त्या सामन्यात फलंदाजीची संधीही मिळाली नाही. परंतु, आता भारतीय संघात विजय शंकर एक प्रमुख खेळाडू बनला आहे. तो भारताच्या विश्वचषक संघातही होता. विजय शंकरने आतापर्यंत अनेक आयपीएल सामने खेळले आहेत आणि प्रमुख अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यांची गणना केली जाते.
२. अरुण कार्तिक (Arun Karthik)
२००८ मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून यष्टीरक्षक फलंदाज अरुण कार्तिक चेन्नई संघाचा सदस्य होता. मात्र, मॅथ्यू हेडन आणि पार्थिव पटेल सलामीवीर म्हणून संघाचा भाग असल्याने कार्तिकला खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. त्यातही धोनी यष्टीरक्षक होता.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एकमेव सामन्यात कार्तिक ७ व्या क्रमांकावर खेळण्यासाठीही आला होता. त्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला अखेरच्या दोन षटकांत २७ धावांची आवश्यकता होती. त्याने अॅल्बी मॉर्केलला जास्तीत जास्त स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला. पण एकदा मॉर्केल बाद झाल्यावर कार्तिक फारसे काही खास करू शकला नाही आणि तो सलग चौथा सामना चेन्नईने गमावला.
३. चंद्रशेखर गणपती (Chandrasekhar Ganpati)
आयपीएलमध्ये चंद्रशेखर गणपतीने सीएसकेकडून एकमेव सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध खेळला. त्याला प्रथम गोलंदाजीची संधी मिळाली परंतु त्याची मध्यमगती गोलंदाजी विराट कोहलीने अगदी सहज खेळली आणि त्याने त्याच्या षटकात १३ धावा केल्या.
फलंदाजीच्या वेळी तो फक्त क्रीजवर येऊ शकला परंतु एकही चेंडू खेळण्यात त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर पुढच्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही आणि त्यानंतर तो आयपीएल सुद्धा खेळू शकला नाही.
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष : क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामने खेळणारे २ भारतीय दिग्गज
ट्वेंटी२० क्रिकेटचे ३ दिग्गज खेळाडू ३, जे केकेआरसाठी ठरलेत सुपर फ्लॉप
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं
आयसीसी टी-२० क्रमवारी: डेव्हिड मलान पहिल्या ५ मध्ये परतला, हाफिजलाही झाला फायदा
आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे