India vs England 2nd Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. दरम्यान इंग्लंडने 5 गडी राखून भारताचा पराभव केला. या सामन्यात काही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली, तर काही खेळाडूंच्या अपयशामुळे निराशा झाली. आता आगामी दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात 3 मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहचा वर्कलोड लक्षात घेता, त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय, आणखी 2 खेळाडूंना प्लेइंग-11 मधून वगळले जाऊ शकते. (India vs England 2nd Test)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ 3 मोठ्या बदलांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. (Team India Playing XI changes)
3) रवींद्र जडेजा- अष्टपैलू रवींद्र जडेजाची कामगिरीही विशेष प्रभावी नव्हती. त्याने पहिल्या डावात 11 आणि दुसऱ्या डावात नाबाद 25 धावा केल्या. त्याला गोलंदाजीतही केवळ एकच विकेट घेता आली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतूनही त्याचा पत्ता कटू शकतो. (Ravindra Jadeja dropped)
2) शार्दूल ठाकूर- अष्टपैलू शार्दूल ठाकूरला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्याच्या कामगिरीने निराशा केली. दोन्ही डावांत त्याने फक्त 5 धावा केल्या आणि गोलंदाजीत फक्त 2 विकेट्स घेतल्या. (Shardul Thakur performance)
1) जसप्रीत बुमराह- बुमराहने पहिल्या कसोटीत जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याने एकूण 44 षटके टाकली आणि पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मात्र, त्याचा वर्कलोड लक्षात घेता दुसऱ्या कसोटीत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. (Jasprit Bumrah workload management)