टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 सामन्यात आज टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान आहे. भारतीय संघानं आपल्या शेवटच्या सामन्यात अमेरिकेला सहज पराभूत केलं होतं. आता भारताचा प्रयत्न सलग दुसऱ्या विजयासह सेमीफायनलमधील आपला दावा मजबूत करण्याचा असेल.
टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत खेळलेले सर्व 4 सामने जिंकले आहेत. मात्र आज कोणताही संघ जिंकला किंवा हरला तरी या सामन्यात दोन्ही संघांच्या काही खेळाडूंना काही विक्रम मोडण्याची संधी आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात कोणते 3 विक्रम मोडले जाऊ शकतात, हे सांगणार आहोत.
अर्शदीप सिंगला आशिष नेहराचा विक्रम मोडण्याची संधी
युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग या टी20 विश्वचषकात शानदार गोलंदाजी करत असून त्यानं भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपला टी20 मध्ये आशिष नेहराला मागे टाकून वेस्ट इंडिजमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याची संधी असेल. या दोघांच्या नावावर सध्या 10-10 विकेट आहेत. अर्शदीप सिंग आज 1 बळी घेताच नेहराला मागे टाकेल.
तंजीम हसन साकिब-रिशाद हुसैन यांना मोठा विक्रम करण्याची संधी
बांगलादेशसाठी एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम दिग्गज शाकिब अल हसनच्या नावे आहे. शाकिबनं 2021 टी20 विश्वचषकात 11 विकेट घेतल्या होत्या. सध्याच्या टी20 विश्वचषकात वेगवान गोलंदाज तनझिम हसन साकिब आणि फिरकी गोलंदाज रिशाद हुसैन यांनी प्रत्येकी 9 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत जो 3 विकेट घेईल तो शाकिबला मागे टाकेल.
अर्शदीप सिंगला आरपी सिंगचा विक्रम मोडण्याची संधी
टीम इंडियासाठी एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज आरपी सिंगच्या नावावर आहे. त्यानं 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या विश्वचषकात 12 बळी घेतले होते. या विश्वचषकात 10 विकेट्स घेणाऱ्या अर्शदीप सिंगकडे 3 विकेट्स घेऊन हा मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराट कोहलीनं या क्रमांकावर फलंदाजी करावी”, खास मित्र एबी डिव्हिलियर्सच्या सूचना
एका संघाचा उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पत्ता कट, तर दुसरा संघ बाहेर जाणाच्या वाटेवर सुपर 8 ची स्थिती काय?
एका चीअरलीडरच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला होता क्विंटन डी कॉक! खूपच फिल्मी आहे लव्ह स्टोरी