आस्ट्रेलियामध्ये आजपर्यंत १० संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामने खेळले. ऑस्ट्रेलियात कसोटी विजय मिळवणं तसं पहिल्यापासूनच कठीण. त्याचमुळे या १० पैकी केवळ ३ संघांना ऑस्ट्रेलियात १० पेक्षा जास्त विजय मिळवता आले आहेत.
इंग्लंड (५७), वेस्ट इंडिज (१८) व दक्षिण आफ्रिका (१०) या संघांनी हे विजय मिळवले आहेत. भारतीय संघ या देशात ४८ कसोटी सामने खेळला असून त्यात ७ विजय, २९ पराभव व १२ सामने अनिर्णित अशी भारताची कामगिरी राहिली आहे.
या ४८ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व हे १३ कर्णधारांनी केले. त्यात केवळ ५ कर्णधारांना येथे कसोटी सामने जिंकण्यात यश मिळाले. 4 Indian Captain to Win Test Match in a Australia.
४. सुनिल गावसकर (१ कसोटी विजय)
सुनिल गावसकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. यात पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर तिसरा सामना भारताने जिंकला. दुसरा सामना अनिर्णित राहिला.
३. सौरव गांगुुली (१ कसोटी विजय)
२००३-०४मध्ये गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने ४ कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. यात भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. यातील पहिला व चौथा सामना अनिर्णित राहिला तर दुसऱ्या सामन्यात भारताने तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.
२. विराट कोहली (२ कसोटी विजय)
२०१४-२०१५मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामने खेळले परंतु यातील पहिल्या व चौथ्या कसोटीत विराटने संघाचे नेतृत्त्व केले. यातील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. तर चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर २०१८-१९मध्ये विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ परत ऑस्ट्रेलियाला ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी गेला. यातील पहिला व तिसरा सामना भारताने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला.
१. बिशनसिंग बेदी (२ कसोटी विजय)
बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने १९७७-७८मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ५ कसोटी सामने खेळले. यातील तिसऱ्या व चौथ्या कसोटीत भारताने शानदार विजय मिळवले. परंतु बाकी ३ कसोटीत पराभवामुळे मालिका ३-२ अशी पराभूत झाले. बेदी हे ऑस्ट्रेलियात २ कसोटी सामने जिंकणारे पहिले भारतीय कर्णधार आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
–दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकणारे ३ भारतीय कर्णधार
–भारतात एकही कसोटी सामना न जिंकणारे ३ महान कर्णधार
–एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज
-२००७ विश्वचषकातील हिरो म्हणतोय यावेळीचा टी२० विश्वचषक खेळणारचं
-सचिनला आऊट झाला की हा खेळाडू करायचा रडायला सुरुवात
-आणि युवराजने बसमधील सिटवर बसलेल्या रोहितला उठवले