क्रिकेटमध्ये सर्वाधिक खराब विकेट कोणती समजली जात असेल तर ती अर्थातच धावबाद म्हणजेच रनआऊट.
बहुतांश वेळा क्रिकेटमध्ये फलंदाजाची विकेट ही चांगल्या गोलंदाजीमुळे किंवा तो खराब फटका खेळल्यामुळे जाते. परंतु धावबाद होणे हे सर्वस्वी फलंदाजी करणाऱ्या संघावर अवलंबून असतं.
जे दोन खेळाडू मैदानावर असतात त्यांच्यात जर फलंदाजी करताना सुसंवाद असेल, तसेच एकमेकांबरोबर फलंदाजी करतानाचा चांगला बंध असेल तर धावबाद होण्याची शक्यता ० टक्के असते.
धावबाद होणे हे समोरच्या संघापेक्षाही फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंवर जास्त अवलंबुन असतं. यामुळे धावबाद होऊन गेलेली विकेट ही एकप्रकारे बहाल केलेली विकेट समजली जाते.
या लेखात आपण वनडेत सर्वाधिक वेळा धावबाद झालेल्या खेळाडूंची ओळख करुन घेणार आहोत. (5 batsmen who got run out most number of times in ODIs)
सर्वाधिक वेळा वनडेत धावबाद झालेले खेळाडू
४१- मारवान आटापटू, २६८ वनडे सामने
४०- इंझमाम उल हक, ३७८ वनडे सामने
४०- राहुल द्रविड, ३४४ वनडे सामने
३९- माहेला जयवर्धेने, ४४८ वनडे सामने
३८- मोहम्मद युसुफ, २८८ वनडे सामने
सर्वाधिक वेळा वनडेत धावबाद होणारे भारतीय फलंदाज (5 Indian batsmen who got run out most number of times in ODIs)
४०- राहुल द्रविड, ३४४ वनडे सामने
३४- सचिन तेंडूलकर, ४६३ वनडे सामने
३२- मोहम्मद अझरुद्दीन, ३३४ वनडे सामने
२३- सौरव गांगुुली, ३११ वनडे सामने
२१- अनिल कुंबळे, २७१ वनडे सामने
ट्रेडिंग बातम्या-
–सर्वाधिक वनडे सामन्यांत एकदाही शुन्यावर बाद न होणारे ५ खेळाडू
–…आणि कसोटी क्रिकेटमधील सर्वात निचांकी धावांचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर झाला
–एवढ्या मोठ्या बोर्डावर निवड होणारा गांगुली पहिलाच भारतीय व्यक्ती