अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला. या मालिकेतील विजयात युवा खेळाडूंचा देखील महत्वाचा वाटा आहे. या मालिकेत विराट कोहलीने सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना खेळण्याची संधी दिली होती. या संधीचे सोने करत दोघांनी ही संघासाठी महत्वाच्या धावा केल्या होत्या.
आता माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघ यांच्यात जर सामना खेळवला गेला तर कोणता संघ जिंकेल याचे उत्तर दिले आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि राहुल चहर यांनी महत्वाची भूमिका बजावली. यासोबतच जसप्रीत बुमराह देखील आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करतो.
हे खेळाडू जर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळले तर उर्वरित खेळाडूंमध्ये विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांसारखे प्रमुख फलंदाज असतील. तर मध्यक्रमात संजू सॅमसन आणि मनीष पांडे यांसारखे फलंदाज असतील. गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर आपली भूमिका पार पाडतील.
असा सामना भविष्यात होणे शक्य नाही आणि होणारही नाही परंतु,अंदाज म्हणून जर असा सामना झाला मुंबई इंडियन्स संघच हा सामना जिंकेल असे आकाश चोप्राचे मत आहे.
आकाश चोप्राने निवडलेला मुंबई इंडियन्स संघ –
क्विंटन डिकॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरोन पोलार्ड, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, नाथन कूल्टर नाइल.
आकाश चोप्राने निवडलेला भारतीय संघ –
विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मनीष पांडे, संजू सैमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर
महत्वाच्या बातम्या:
अद्वितीय! युवराजच्या कारकिर्दीला लाभली सोनेरी किनार, उंचावली आणखी एक ट्रॉफी
अन् दस्तरखुद्द आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला; सोशल मीडियावर होतंय कौतुक
विजेत्या इंडिया लीजेंड्सचे हॉटेल स्टाफतर्फे जंगी स्वागत, युवीचा झक्कास डान्स लावेल वेड; पाहा व्हिडिओ