क्रिकेटमध्ये आपल्या देशासाठी खेळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. काही खेळाडू या बाबतीत जिंकतात तर अनेकांना संधी मिळत नाही. आज आपण अशाच एका भारतीय गोलंदाजाची माहिती पाहणार आहोत, ज्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द भलेही लहान असेल, पण तो क्रिकेटमध्ये एखाद्या सनसनाटीपेक्षा कमी नव्हता. क्रिकेटमध्ये हॅट्रिक हे कोणत्याही गोलंदाजाचं स्वप्न असते. ज्या गोलंदाजाबद्दल आपण पाहणार आहोत, त्याच्या नावावर तिन्ही फॉरमॅटमध्ये हॅट्रिक आहे.
भारताच्या अभिमन्यू मिथुननं (Abhimanyu Mithun) तिन्ही फॉरमॅटमध्ये हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला. मात्र, मिथुननं देशांतर्गत क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली आहे. एवढंच नाही तर एकदा त्यानं टी20मध्ये एका षटकात 5 विकेट्सही घेतल्या होत्या. टी20 फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करणं एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये एवढी मोठी कामगिरी करुनही अभिमन्यू मिथुनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तेवढी मोठी राहिली नाही.
अभिमन्यू मिथुननं आपल्या रणजी कारकिर्दीला धमाकेदार सुरुवात केली. नोव्हेंबर 2009मध्ये त्यानं कर्नाटकसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि उत्तर प्रदेश विरुद्ध खेळलेल्या पहिल्याच सामन्यात त्यानं कहर केला. दुसऱ्या डावातील 60व्या षटकात सलग तीन विकेट घेत त्यानं हॅट्ट्रिक मिळवली. त्यानं पीयूष चावला, आमिर खान आणि आरपी सिंग यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
त्यानं विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत हॅटट्रिक घेतली होती. शेवटच्या षटकात त्यानं तामिळनाडूच्या शाहरुख खान, मोहम्मद आणि मुरुगन अश्विनला लागोपाठ तीन चेंडूत बाद केलं. फायनल सामन्यात त्यानं 5 विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला होता.
मिथुलनं 2021मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अबुधाबीमध्ये झालेल्या टी10 लीग सामन्यादरम्यान मिथुनवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. एका सामन्यात त्यानं लांब नो बॉल टाकला होता, त्यामुळे तो वादात सापडला होता.
अभिमन्यू मिथुननंच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 4 कसोटी, 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 4 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 8 डावांमध्ये गोलंदाजी केली. त्यामध्ये त्यानं 9 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा गोलंदाजी इकाॅनाॅमी रेट 3.80 राहिला आहे. तर 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 3 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
SLvsIND : “गंभीरने रोहित-विराटला खेळवायला घाई करायला नको होती”, नेहराचं रोखठोक विधान
“आजचे खेळाडू 400 धावा…” भारताच्या दिग्गज खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य!
IND vs SL भारताविरुद्ध कहर केलेल्या फिरकी गोलंदाजानं केला मोठा खुलासा, म्हणाला…