भारतीय संघासाठी मागच्या मोठ्या काळापासून शुबमन गिल डावाची सुरुवात करत आहे. मात्र, वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने स्वतःहून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीचा निर्णय घेतला. संघ व्यवस्थापनाने त्याला तिसऱ्या क्रमांकावर केळवले. पण सामन्याच्या पहिल्या डावात त्याने अवघ्या 6 धावांवर विकेट गमावली. याच पार्श्वभूमीवर गिलच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यानेही गिल स्वस्तात बाद झाल्यानंतर मत व्यक्त केले.
आकाश चोप्रा (Akash Chopra) म्हणाला, “शुबमन गिल (Shubman Gill) डिफेंसिव शॉट कठोर हातांनी खेळत आहे. यामुळेच कसोटी क्रिकेटमध्ये तो सतत अशा पद्धतीने बाद होत आहे. भारतासाठी कसोटी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे सोपे नाहीये. शुबमन गिललाही ही गोष्ट चांगली माहीत आहे. त्याव्यतिरिक्त आतापर्यंत तो सलामीवीर म्हणून खेलत आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर रुळण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे. तसेच त्याला फलंदाजीसाठी बरीच वाट पाहावी लागली. कारण रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने मोठी भागीदारी केली. या सर्व गोष्टी असल्या तरी मला वाटते गिलच्या शैलीत सुधारणा होऊ शकते.”
“तुम्हाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची इंदोर कसोटी लक्षात असेल. या सामन्यात शुबमन गिल अगदी अशाच पद्धतीने बाद झाला होता. त्यावेळीही गिलने कठोर हातांनी डिफेंसिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण विकेट गमावली होती. शुबमन गिलला या शॉटवर काम केले पाहिजे. खासकरून कसोटी क्रिकेट खेळताना. असे असले तरी, गिल एक अप्रतिम फलंदाज आहे, यात कुठलेच दुमत नाही,” असे आकाश चोप्रा शेवटी म्हणाला.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला तर दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ 162 धावांनी आघाडीवर आहे. नाणेफेक जिंकून यजमान वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण अवघ्या 150 धावांवर त्यांचा संपूर्ण संघ तंबूत परतला. रविचंद्रन अश्विन याने पाच विकेट्स घेत विरोधी संघाला स्वस्तात गुंडाळळे. प्रत्युत्तरात भारतासाठी सलामीवीर रोहित शर्मा (103) आणि यशस्वी जयस्वाल (143*) यांनी वैयक्तिक शतके ठोकली आणि संघाला जोरदार सुरुवात मिळवून दिला. दुसऱ्या दिवसाखेर भारताची धावसंख्या दोन बाद 312 आहे. विराट कोहली 36* धावांसह खेळपट्टीवर कायम आहे. (According to Akash Chopra, Shubman Gill can still improve his technique in Test cricket)
महत्वाच्या बातम्या –
भारत-विंडीज मालिकेदरम्यान ICCने बदलला Slow Over Rate नियम, खेळाडूंच्या खिशावर पडणार फरक
भारताची रणरागिणी ज्योती आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चमकली, 100 मीटर हर्डल्समध्ये जिंकले Gold