जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात रविचंद्रन अश्विन खेळू शकला नाही. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हातून 209 धावांनी पराभूत झाला. अंतिम सामन्यात अश्विनला खेळपट्टीचे कारण देत प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. मात्र, कर्णधार-प्रशिक्षकाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रविचंद्रन अश्विन देखील याविषयी बोलला आहे. अश्विनच्या मते फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी संघात समान न्याय मिळाला पाहिजे.
भारतीय संघ (Team India) डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात चार वेगवान गोलंदाजांसह खेळला. सामन्यापूर्वी ग्रीन टॉप खेळपट्टी पाहून फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील न करण्याचा निर्णय घेतला गेला. अस्विनने सांगितल्याप्रमाणे सामन्याच्या 48 तास आधीच त्याला ही बातमी समजली होती की, तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नसेल. खेळपट्टीचे कारण देत अश्विनला बाहेर बसवण्यात आले, पण भारताच्या फलंदाजी क्रमात कुठलाच मोठा निर्णय घेतला नाही. याच पार्श्वभूमीवर अश्विनने नाराजी व्यक्त केली. कारकिर्दीच्या सुरुवातीला अश्विन एक फलंदाज होता, पण भविष्याची गजर ओळखून त्याने गोलंदाज बनण्याचा निर्णय घेतला. अश्विनचा हाच निर्णय आता त्याला चुकीचा वाटत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अश्विन याविषयी बोलला.
“ही एगदीच खरी गोष्ट आहे मी काहीच खोटे सांगत नाहीये. एक दिवस मी भारत-श्रीलंकाचा सामना पाहत होतो. भारतीय संघाचे गोलंदाजी आक्रमण अपयशी ठरत होते. सचिन तेंडुलकर माजा आवडता खेळाडू आहे आणि तो ज्या धावा करत होता, त्या गोलंदाजीमुळे वाया जात होत्या. एक दिवस मी असाच विचार केला की, मी गोलंदाज बनलो पाहिजे. सध्या संघात खेळणाऱ्या गोलंदाजांपेक्षा मी चांगली गोलंदाजी करू शकतो का? असे मला वाटले. ही अगदीच अनोखी विचारसरणी आहे. पण मी असाच विचार केला होता आणि ऑफ स्पिन गोलंदाजीला सुरुवा केलेली. इथूनच या सगळ्याची सुरुवात झाली होती. पण उद्या जेव्हा मी निवृत्ती घेईल, तेव्हा मला याची खंत असेल की, मी चांगला फलंदाज होतो. मी कधीच गोलंदाज बनायला नको होते.”
“फलंदाजांनी खेळू नये असे मी म्हणत नाहीये. त्यांनी खेळलंच पाहिजे, पण त्यांच्याप्रमाणेच गोलंदाजांनी देखील खेळले पाहिजे. या दोघांनाही समान वागणूक मिळाली पाहिजे,” असेही अश्विन पुढे म्हणाला. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी दोन दिवसी वेगवान गोलंदाजांनी मदत मिळाल्याचे दिसले. मात्र शेवटच्या दोन दिवसात ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नेथन लायन याने कमाल केली. अश्वात भारताकडे अस्विनसारखा फिरकीपटू असता, तर संघाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकत होता. अस्विन या सामन्यात खेळला नसला, तरी आयसीसी त्याच्या कसोटी क्रमवारीत त्याने आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. (after being dropped from WTC final, Ravichandran Ashwin says he regrets being a bowler)
महत्वाच्या बातम्या –
प्रेम हे! लग्नानंतर चांगलाच चमकला ऋतुराज, पत्नीचा जर्सी नंबर घालून ठोकलं झंझावाती अर्धशतक
चेतन शर्मा पुन्हा बनले निवडकर्ते! IPLच्या फ्लॉप खेळाडूला बनवून टाकलं संघाचा कर्णधार, वाचाच