यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) ट्राॅफीवर भारतानं नाव कोरले. भारतानं फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पछाडून बार्बाडोसच्या मैदानावर तिरंगा रोवला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार 76 धावांची शानदार खेळी केलेल्या दिग्गज विराट कोहलीला (Virat Kohli) देण्यात आला. तत्पूर्वी कोहलीनं भारतानं ट्राॅफी जिंकल्याच्या पोस्ट इंस्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केल्या होत्या. त्या पोस्टला भारतामध्ये सर्वाधिक लाईक्स आल्या आहेत.
विराट कोहलीनं (Virat Kohli) फायनल सामन्यात 76 धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात त्यानं 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले आणि भारताला सामना जिंकून दिला. या सामन्यानंतर कोहलीनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यापाठोपाठ रोहितनं देखील निवृत्तीची घोषणा जाहीर केली. कोहलीनं भारतीय संघाचा ट्राॅफी उंचावतानाचा आणि त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्टला 1 कोटी 62 लाख 88 हजार 916 लाईक्स आल्या आहेत. ज्या भारतामध्ये आतापर्यंत कोणत्याही पोस्टला आल्या नाहीत. याआधी कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या फोटोला इंस्टाग्रामवर भारतामध्ये सर्वाधिक लाईक्स होत्या परंतू कोहलीच्या वर्ल्डकपच्या एका पोस्टनं इंस्टाग्रामवर या जोडीच्या लाईक्सला मागे टाकत भारतामध्ये सर्वाधिक लाईक्स मिळवल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
1983 ते 2024…विश्वचषक जिंकणाऱ्या सर्व भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, एकाचं नाव तुम्ही कधीच ऐकलं नसेल!
फायनल सामन्यात अर्धशतक ठोकून विराट कोहलीनं रचला इतिहास!
मोठी बातमी: रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त