---Advertisement---

गुजरातकडून धक्कादायक पराभवानंतर हार्दिक पांड्याने उघड केली पराभवाची कारणं

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत 18 व्या हंगामात अजूनही मुंबई इंडियन्स संघासाठी विजयाची दारं उघडली नाहीत. शनिवार 29 मार्च रोजी आयपीएल 2025 स्पर्धेतील 9 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 196 धावा केल्या होत्या, नंतर धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ फक्त 160 धावा करू शकला. सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने पराभवाचे कारण स्पष्ट केल आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने गुजरात विरुद्ध पराभव झाल्यानंतर स्वीकार केले आहे की, त्यांच्या संघाने खूप चुका केल्या.

गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 18 धावांवर दोन खेळाडू बाद झाले. त्यानंतर 34 धावांवर सुद्धा परत दोन खेळाडू बाद झाले. सूर्यकुमार यादवने 48 धावा केल्या तसेच तिलक वर्माने 39 धावा केल्या. मुंबईसाठी सर्वोत्तम भागीदारी सूर्यकुमार आणि तिलक वर्माने 62 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर संघ 160 धावा करू शकला.

गुजरातसाठी साई सुदर्शनने 41 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकांसह 63 धावा केल्या. तसेच कर्णधार शुबमन गिलने 38 धावा केल्या. जॉस बटलरने 39 धावा यांसह गुजरातचे 8 खेळाडू बाद होऊन त्यांनी 196 धावा केल्या.

मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने सामन्यानंतर म्हटले आहे की, काही चुका झाल्या. मैदानात आम्ही म्हणाव तितकं चांगले खेळलो नाही. ज्यामुळे आमच्या 20-25 धावांचं नुकसान झालं. गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी पावर-प्ले मध्ये चांगली कामगिरी केली. त्यांनी अडचणीत टाकतील असे शॉट खेळले नाहीत. त्यांनी जास्त धावा केल्या ज्यामुळे आम्ही जिंकू शकलो नाही.

तसेच तो पुढे म्हणाला, आता सुरुवातीचे सामने आहेत पण फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. आशा आहे की ते लवकरच चांगली कामगिरी करतील.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---