ऑस्ट्रेलियात होणारा टी20 विश्वचषक सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मागील विश्वचषकात आलेले अपयश भारतीय संघाच्या अजूनही लक्षात असेल. या विश्वचषकासाठी आता भारतीय संघाची निवड झाली असून, तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध भारतीय संघ दोन हात करेल. मात्र, या विश्वचषकापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना माजी भारतीय अष्टपैलू अजय जडेजा यांनी एक वॉर्निंग दिली आहे.
एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जडेजा यांनी अनेक मुद्द्यांवर लक्ष वेधले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना एक सल्ला देखील दिला. जडेजा म्हणाले,
“प्रत्येक सामन्यानंतर बदल केले तर खेळाडूंच्या मनात संभ्रम निर्माण होईल. भारतीय क्रिकेटमध्ये हे काही नवीन नाही. मला माहित आहे की प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात ताळमेळ आहे. मात्र, पत्रकारांसमोरही तो समन्वय दिसणे महत्त्वाचे आहे. कधीकधी तुम्हाला पत्रकार परिषदेत काही गोष्टी सांगायच्या असतात, कारण त्या संघासाठी महत्त्वाच्या असतात. वास्तविकता काय आहे हे तुमच्या संघाला माहीत असते. कर्णधार व प्रशिक्षक यांनी केवळ एकदा दिलेल्या मतावर ठाम राहणे गरजेचे आहे.”
भारतीय संघाने गेल्या टी20 विश्वचषकापासून संघात बरेच प्रयोग केले आहेत. अनेक खेळाडूंना कर्णधारपद दिले गेलेले. त्याचबरोबर सलामीवीर म्हणून देखील अनेक पर्याय आजमावले गेले आहेत. मात्र, त्याचा फारसा काही फायदा झाला नाही. एक मजबूत संघ असतानाही आशिया कपमध्ये भारताला अंतिम फेरीतही पोहोचता आले नव्हते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना प्रॅक्टीस ना क्रिकेटच्या चर्चा, फक्त पत्नीसोबत…! सूर्याने सांगितले विस्फोटक फलंदाजीचे रहस्य
टी20 विश्वचषकापूर्वी खूपच बिझी आहे भारतीय संघ; पाहा कधी, कोणाविरुद्ध खेळणार आहे सामने?
शेन बाँड हेड कोच, तर एमआय एमिरेट्सच्या कोचिंग स्टाफमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश