भारतीय क्रिकेट संघ यावर्षी होऊ घातलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी तयारीला लागला आहे. सप्टेंबर महिन्यात भारतातच हा विश्वचषक आयोजित केला जाईल. या विश्वचषकासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने विशेष रणनीती तयार केली असून, केवळ 20 खेळाडूंना बदलून संधी देण्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने या विश्वचषकासाठी अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला संधी देण्यात यावी असे विधान केले आहे.
वनडे विश्वचषकासाठी केवळ 20 खेळाडूंना बदलून संधी देण्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. संघाचा अनुभवी फिरकीपटूर रविचंद्रन अश्विन हा कदाचित संघाच्या या योजनेचा भाग नाही. कारण, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संधी देण्यात आली नाही. याच कारणाने अजय जडेजा याने अश्विन याला पाठिंबा दर्शवला आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना जडेजा म्हणाला,
“या विश्वचषकासाठी अश्विनला संधी मिळायला हवी. कारण भारतात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची राहते. अश्विनकडे नक्कीच तितका अनुभव आहे ज्यामुळे तो संघासाठी मोठी भूमिका बजावताना दिसेल. अश्विन आणि जडेजा ही जोडी नक्कीच प्रभावी ठरेल.”
त्याने सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा प्रमुख फिरकीपटू असलेल्या युजवेंद्र चहल याच्याविषयी बोलताना म्हटले,
“चहलला सातत्याने खेळवण्याची गरज नाही. कारण, तो तयार खेळाडू आहे. त्याला तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा तो उभा राहील.”
अश्विन आज सध्या कसोटी संघाचा प्रमुख फिरकीपटू आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केलेली. मात्र, त्याआधी झालेल्या टी20 विश्वचषकात तो गोलंदाज म्हणून प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेला. सहा सामन्यांमध्ये त्याला केवळ सहा बळी घेण्यात यश आलेले.
(Ajay Jadeja Backs Ashwin For ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
40 वर्षापासून श्रीलंका भारतात फेल! सूर्य खेळीने विजय साकार, भारताच्या यशाचे काही बलाढ्य रेकॉर्ड्स
आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम