सहा महिन्यांपर्यंत भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खराब कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र, अगदी काही दिवसात सुरू होत असलेल्या दुलीप ट्रॉफीत तो पश्चिम विभागाचे नेतृत्व करताना दिसेल.
सप्टेंबर महिन्यात भारतीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला सुरुवात होतेय. ८ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या काळात दुलीप ट्रॉफी खेळली जाईल. साखळी फेरीचे सामने चेन्नई येथे खेळले जातील. तर, अंतिम सामन्याचे यजमानपद कोइंबतूर भूषवेल.
दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाच्या संघाची निवड झाल्याचे वृत्त एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिले आहे. या वृत्तानुसार, भारतीय संघाचे नेतृत्व केलेला अजिंक्य रहाणे हा पश्चिम विभागाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. त्याच्यासह संघात नऊ मुंबईच्या खेळाडूंचा समावेश आहे. रहाणेव्यतिरिक्त पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, यशस्वी जयस्वाल, तनुष कोटीयान, शम्स मुलाणी व हार्दिक तामोरे या मुंबईकरांना संधी देण्यात आली.
महाराष्ट्राचा राहुल त्रिपाठी, सौराष्ट्राचा जयदेव उनाडकद व चिराग जानी तसेच गुजरातचे चिंतन गजा व हेत पटेल यांना देखील या संघ स्थान दिले गेले आहे. बडोद्याचा अतित सेठही संघाचा भाग असेल.
अनुभवी श्रेयस अय्यर हा आशिया चषकासाठी राखीव खेळाडू असल्याने या निवडीसाठी उपलब्ध नव्हता. तसेच सरफराज खान, मुकेश चौधरी, ऋतुराज गायकवाड व अरझान नागवासवाला हे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी इंडिया ए संघात सामील आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशच घोडं आशिया कप आधीच अडल! एका पाठोपाठ तीन मॅचविनर स्पर्धेतून बाहेर
‘गिलने धवनची चिंता वाढवली! पण…’ माजी दिगग्जाने सांगितले
संघात बुमराह-शमी नसतील तेव्हा ‘त्याला’ संधी द्या! माजी दिग्गज गोलंदाजाने दिलाय मोलाचा सल्ला