---Advertisement---

धोनीसोबतचा प्रसंग आणि इतरही आठवणींना उजाळा, अनुष्काकडून ‘कर्णधार’ विराटचे अभिनंदन; ‘My Love…’

On: रविवार, जानेवारी 16, 2022 3:55 PM
Virat-Kohli-Anushka-Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेली सात वर्ष सातत्याने भारतीय संघाची धुरा वाहणारा विराट आता केवळ फलंदाज म्हणून भारतीय क्रिकेटसाठी आपले योगदान देईल. त्याच्या या निर्णयानंतर आता त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने विराटने नेतृत्व सोडल्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

https://www.instagram.com/p/CYyUQ-ksZk8/?utm_medium=copy_link

अनुष्काने केली सोशल मीडिया पोस्ट
विराटने नेतृत्व सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी व प्रसिद्ध सिने अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून दोन फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यामध्ये तिने २०१४ ते आजतागायत विराटने कर्णधार केलेल्या प्रवासाचा अनुभव सांगितला. तसेच, तु तुझे काम व्यवस्थित केल्याचे प्रमाणपत्रही दिले.

अनुष्का शर्माने केलेल्या पोस्टचा सारांश-

‘मला २०१४ मधील तो दिवस आठवतो, जेव्हा तू मला म्हणाला होता की एमएस (धोनी) कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे आणि तुला कर्णधार बनवण्यात आले आहे. मला आठवतंय त्या दिवशी एमएस, तू आणि मी बोलत होतो आणि तो (धोनी) गमतीने म्हणाला होता की, लवकरच तुझी दाढी पांढरी व्हायला लागेल. यावर आपण सगळे खूप हसलो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तुझा विकास आणि तुझ्या नेतृत्वाखालील संघाच्या कामगिरीचा मला अभिमान आहे. तु केलेल्या प्रगतीचे मला कौतुक वाटते.

२०१४ मध्ये आपण तरुण होतो, निष्पाप होतो. चांगले हेतू, सकारात्मक दृष्टीकोन आणि हेतूनेच जीवनात पुढे जाता येते, असे त्यांना वाटायचे. हे सर्व आवश्यक आहेत, परंतु आव्हानांशिवाय नाही. तु अशा अनेक आव्हानांचा सामना केला आहे, जे नेहमीच मैदानात आले. मात्र, हेच जीवन आहे, नाही का? तु स्वतः उदाहरण देऊन नेतृत्व केले आणि जिंकण्यासाठी तुझी सर्व शक्ती पणाला लावली. अनेक वेळा माझा पराभव झाला तेव्हा तुझ्यासोबत बसताना मला तुझ्या डोळ्यात अश्रू दिसले.

तू परिपूर्ण नाहीस आणि तुझ्यातही दोष आहेत, पण मग त्या लपवण्याचा प्रयत्न कधी केलास? तू नेहमीच योग्य आणि कठीण गोष्टींसाठी उभे राहिलात. तुला कधीही कशाचाही हव्यास नव्हता. अगदी या पदासाठीही (कर्णधारपद) नाही आणि मला ते माहीत आहे. कारण, जेव्हा कोणी एखाद्या गोष्टीला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो स्वतःला मर्यादित करतो आणि तू अमर्याद आहेस.’
अनुष्काने विराटचे वडील म्हणून कौतुक करत तिची पोस्ट संपवली.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---