आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने होते. हा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने अक्षरश: धमाल केली. भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात चमकदार कामगिरी केली. भारताने पाकिस्तानला 228 धावांनी पराभूत केले. हा पाकिस्तानविरुद्धच्या वनडेतील भारताचा सर्वात मोठा विजयही ठरला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा याचा आनंग गगनात मावेनासा झाला. या विजयानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधत आहे.
काय-काय म्हणाला रोहित?
सामन्यात पावसाने चाहत्यांसोबतच दोन्ही संघांना आणि ग्राऊंड्समन्सला चांगलाच त्रास दिला. त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) याने ग्राऊंड्समन यांचे आभार मानले. सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला, “आम्ही फक्त मैदानात उतरू इच्छित होतो, जेणेकरून आम्हाला आणखी काही वेळ मिळेल. हे फक्त ग्राऊंड्समनच्या शानदार प्रयत्नांमुळे शक्य होऊ शकले. मला माहितीये की, संपूर्ण ग्राऊंड कव्हर करणे आणि कव्हर काढणे किती कठीण काम आहे. पूर्ण संघाकडून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो.”
यानंतर रोहितने संघाच्या शानदार फलंदाजीविषयी भाष्य केले. रोहित म्हणाला, “कालपासूनच शानदार प्रदर्शन. जेव्हा आम्ही सुरुवाती केली होती, तेव्हा आम्हाला माहिती होते की, खेळपट्टी चांगली आहे आणि आम्हाला पावसासोबत तडजोड करावी लागेल. दोन अनुभवी खेळाडू (राहुल आणि विराट). आम्हाला माहिती होते की, ते थोडा वेळ घेतील आणि त्यानंतर आम्ही जाऊ शकतो.”
पुढे बोलताना रोहितने संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचेही कौतुक केले. तो म्हणाला, “तो चांगला दिसला. त्याने दोन्ही बाजूंनी स्विंग केला आणि त्याने मागील 8-10 महिने नक्कीच कठोर मेहनत घेतली आहे. बुमराह फक्त 27 वर्षांचा आहे, त्याच्यासाठी सामन्यांना मुकणे चांगले नाहीये. मात्र, ज्याप्रकारे त्याने गोलंदाजी केली, ते दाखवून देते की, तो काय आहे.”
रोहितने सांगितले की, सलामी भागीदारीत सकारात्मकता होती. तो म्हणाला, “पाहत होतो की, आम्ही कशी फलंदाजी केली. सलामीवीरांसोबत अनेक सकारात्मक होतो. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल. विराटची खेळी खूपच शानदार पद्धतीने खेळली गेली. त्यानंतर केएल, दुखापतीतून पुनरागमन करणे आणि नाणेफेकीपूर्वी 5 मिनिटांआधी समजणे की, तो खेळत आहे. अशाप्रकारे खेळणे खेळाडूंची मानसिकता दाखवते.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 2 विकेट्स गमावत 356 धावा केल्या होत्या. यामध्ये विराट कोहली (नाबाद 122) आणि केएल राहुल (नाबाद 111) यांच्या शतकांचा समावेश होता. तसेच, सलामीवीर शुबमन गिल (58) आणि रोहित शर्मा (56) यांच्या अर्धशतकांचाही समावेश होता. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 32 षटकात 10 विकेट्स गमावत 128 धावाच करू शकला. यामध्ये चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) सर्वाधिक 5 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे हा सामना भारतीय संघाने तब्बल 228 धावांच्या फरकाने नावावर केला. (asia cup 2023 super 4 indian skipper rohit sharma reaction on biggest odi win against pakistan read)
हेही वाचा-
जडेजाकडून निघाले पाकिस्तानी फलंदाजाचे रक्त, तत्काळ विचारपूर करणाऱ्या राहुलचे सर्वत्र कौतुक
भारताचा सर्वात मोठा विजय! कुलदीपपुढे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळली पाकिस्तानची फलंदाजी