एशिया कप (Asia Cup) २०२२साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर संघाचा उपकर्णधार म्हणून केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. कोरोना आणि दुखापतीमुळे अधिक काळ बाहेर राहिलेल्या राहुलला अनेक मालिकांना मुकावे लागले होते. आता त्याचे संघात पुनरागमन झाल्यावर अचानक उपकर्णधाराची जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तुम्हालाही यामागचे कारण काय हे जाणून घेण्याची इच्छा असेलच.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दरवर्षी खेळली जाते. यामध्ये भारताचेच नाहीतर बाहेरील देशाचे खेळाडूही सहभागी होतात. या स्पर्धेतील केएल राहुल (KL Rahul) याची कामगिरी पाहिली, त्याने लागोपाठ ५ हंगामात ५००पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच त्याने चार वेळा ६०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याच्यासारखी कामगिरी कोणत्याही भारतीय खेळाडूला जमलेली नाही. राहुल हा २०२२च्या आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्स या संघाचा कर्णधार होता. लखनऊ प्लेऑफपर्यंत पोहोचली देखील होती.
आयपीएलमध्ये राहुलची कामगिरी
राहुलने २०२२च्या आयपीएल हंगामात जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याने १५ सामन्यांत ५१च्या सरासरीने ६१६ धावा केल्या. यामध्ये २ शतके आणि ४ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याचा स्ट्राईक रेट १३५ तर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद १०३ होती. त्याने आयपीएलच्या हंगाम २०२१मध्ये ६२६ धावा, २०२०मध्ये ६७० धावा, २०१८मध्ये ६५९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने कमीत कमी ३ हंगामात एक तरी शतक झळकावले. त्याने १०९ आयपीएल सामने खेळतना ४८च्या सरासरीने ३८८९ धावा केल्या. यामध्ये ४ शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही रेकॉर्डतोड कामगिरी
राहुलचा आयपीएलबरोबरच आंतरराष्ट्रीय टी२०मध्येही चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ५६ सामन्यांतील ५२ डावांमध्ये ४१च्या सरासरीने १८३१ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतक आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद ११० आहे. तसेच त्याने ७३ षटकारही मारले आहेत.
राहुलच्या संघातील पुनरागमनाने ‘हे’ ४ खेळाडू संघातून झाले आउट
यंदाचा आयपीएल हंगाम झाल्यानंतर ४ खेळाडू सलामीला आले होते. मात्र राहुलच्या संघात येण्याने त्यांना बाहेर व्हावे लागले आहे. यामध्ये इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे. अय्यरला राखीव खेळाडू म्हणून घेतले आहे. इशानने ९ सामन्यांत २ शतकांसह २५४ धावा, ऋतुराजने ५ सामन्यांत एक अर्धशतकासह ९६ धावा, अय्यरने एका सामन्यात ६४ आणि सॅमसनने एका सामन्यात ७७ धावा केल्या आहेत.
उल्लेखनीय कामगिरी करण्याचे आव्हान
राहुल संघात जरी परतला असला तरी त्याच्यासमोर मोठे आव्हान आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. यामुळे ही एशिया कप स्पर्धा महत्वाची आहे. यामध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कारण या स्पर्धेत जे खेळाडू उत्तम खेळतील त्यांची टी२० विश्वचषकासाठीच्या संघात निवड होण्याची शक्यता आहे. भारत मागील टी२० विश्वचषकात साखळी फेरीतूनच बाहेर झाला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात! एकवेळी खेळाडू म्हणून एशिया कप खेळलेले शिलेदार; आता एक कॅप्टन, तर दुसरा बनलाय कोच
भारतीय संघातून बाहेर असलेल्या गोलंदाजाचे इंग्लंडमध्ये जबरदस्त प्रदर्शन, व्हायरल होतोय व्हिडिओ
रोहित, विराट की धोनी? पाहा कोण झालंय एशिया कपमध्ये सर्वाधिक यशस्वी