---Advertisement---

आयपीएलपूर्वी BCCI मोठी घोषणा, टीम इंडियाला करावी लागणार धावपळ! पहा नेमकं प्रकरण

On: शनिवार, मार्च 22, 2025 6:15 PM
---Advertisement---

आज, शनिवारी कोलकाता येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सर्वोच्च परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भारतीय क्रिकेट संघ यंदा वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघांचे यजमानपद भूषवणार आहे. यासाठी बीसीसीआयने वेळापत्रक निश्चित करत अंतिम स्वरूप दिले आहे.

भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना पंजाबमधील मोहाली येथे खेळला जाईल. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे होईल. यानंतर, भारत नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांसाठी यजमानपद भूषवेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना दिल्लीत खेळला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. गुवाहाटीत पहिल्यांदाच कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गुवाहाटी कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाईल.

त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना 3 डिसेंबर रोजी रायपूर येथे आणि तिसरा एकदिवसीय सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाईल. यानंतर, टी-20 सामने अनुक्रमे 9, 11, 14, 17, 19 डिसेंबर रोजी कटक, नागपूर, धर्मशाळा, लखनऊ आणि अहमदाबाद येथे होतील.

महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 फक्त भारतात होणार आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होऊ शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला विश्वचषकाचा उद्घाटन सामना आणि उद्घाटन समारंभ विशाखापट्टणम येथे होणार आहे. महिला विश्वचषकाचे सामने मुल्लानपूर, इंदूर, तिरुवनंतपुरम आणि गुवाहाटी येथेही होतील. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर बदल केले जाऊ शकतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---