भारतीय क्रिकेेट कंट्रोल बोर्डाने गुरुवारी (दि. 1 डिसेंबर) आपल्या सल्लागार समितीच्या नियुक्तीची घोषणा केली. या समितीत एकूण 3 सदस्य असणार आहेत. या सदस्यांमध्ये अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुलक्षणा नाईक सामील आहेत. टी20 विश्वचषकात भारताच्या पराभवामुळे बीसीसीआयने कठोर कारवाईचे सत्र सुरु केले होते. या अंतर्गत बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली असलेली निवड समिती बरखास्त केली होती.
या सल्लागार समितीमध्ये निवड झालेेल्या सदस्यांनी यांनी याआधी देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अशोक मल्होत्रा (Ashok Malhotra) यांनी भारतासाठी 7 कसोटी आणि 20 एकदिवसीय सामने खेळले आणि त्यांनी नुकतेच भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. जतिन परांजपे (Jatin Paranjape) यांनी भारताकडून 4 एकदिवसीय सामने खेळले आणि ते वरीष्ठ पुरुष संघाच्या निवड समितीचा देखील भाग होते. सुलक्षणा नाईक (Sulakshana Naik) यांनी भारतीय महिला क्रिकेट संघासाठी दोन कसोटी, 46 एकदिवसीय सामने आणि 31 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले.
बीसीसीआयने बनवलेली ही सल्लागार समिती निवड समितीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करणार असून छाननी केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवणार आहेे. टी-20 विश्वचषकात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सर्वत्र भारतीय संघाविरुद्ध आणि निवड समितीविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर बीसीसीआयने काही कठोर निर्णय घेतले.
भारताची विश्वचषाकची झोळी 11 वर्षांपासून रिकामीच आहे. यावर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय चाहत्यांनी बऱ्याच अपेक्षा होत्या. विश्वचषकाचा दुष्काळ यावर्षी संपावा यासाठी चाहते प्रार्थनाही करत होते. मात्र, यंदाही भारतीयांच्या पदरी निराशाच पडली. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला होता, पण उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडच्या हातून 10 विकेट्सने लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनावर टीकेची झोंब उठली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अँडरसनसोबतच्या ‘त्या’ कृत्यामुळे संघातून बाहेर होता ‘हा’ विस्फोटक खेळाडू, आता शतक ठोकत केले पुनरागमन
पाकिस्तान दौऱ्यात इंग्लंडचे ओपनर बरसले! क्राउले-डकेटच्या तुफानी फलंदाजीने भारताचे अनेक विक्रम मोडीत