भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) गेल्या 15 दिवसांत असे तीन निर्णय घेतले, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात बोर्डबद्दल आदर वाढला आहे. यामध्ये दोन निर्णय टी20 वर्ल्ड कप 2024 शी संबंधित आहेत.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतेच कर्करोगानं ग्रस्त माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्या मदतीसाठी 1 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. वास्तविक, अंशुमन गायकवाड कर्करोगाशी झुंज देत आहे. त्यांना रक्ताचा कर्करोग झाला आहे. सध्या त्यांच्यावर लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी बीसीसीआयकडे अंशुमन यांच्यासाठी मदतीची याचना केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं अंशुमन यांना 1 कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलंय. बीसीसीआयच्या या निर्णयाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.
बीसीसीआयनं यापूर्वी टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. भारतीय क्रिकेट संघानं 2024 टी20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. भारतानं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यानंतर बीसीसीआयनं भारतीय संघाला एवढ्या मोठ्या बक्षिस रकमेची घोषणा केली. बीसीसीआयचा हा महत्त्वाचा निर्णय होता.
भारतीय संघानं टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर एक वेगळीच घटना घडली. वास्तविक, ज्या दिवशी अंतिम सामना होता, त्याच्या दुसऱ्या दिवशी बार्बाडोसमध्ये चक्रीवादळानं धडक दिली. त्यामुळे भारतीय खेळाडू, संपूर्ण सपोर्ट स्टाफ तसेच अनेक क्रीडा पत्रकार तेथेच अडकून पडले. यानंतर बीसीसीआयनं या सर्वांना बार्बाडोसमधून बाहेर काढण्यासाठी विशेष विमान पाठवलं. या फ्लाइटमध्ये टीम इंडियासोबत त्यांचं कुटुंबही आलं होतं. या स्पेशल फ्लाइटमुळे टीम इंडियाशी संबंधित प्रत्येकजण सुखरूप मायदेशी परत येऊ शकला. यामुळे जय शाह यांचं सर्वत्र कौतूक झालं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
कपिल देव यांचे प्रयत्न फळाला! कॅन्सरशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला बीसीसीआयकडून तातडीनं मदतीची घोषणा
काय सांगता! एका चेंडूत 13 धावा ठोकल्या…!! टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
रिकी पाँटिंगनंतर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक कोण बनेल? सौरव गांगुलीनं केला खुलासा