---Advertisement---

रोहित-विराटसाठी BCCI ची नवी रणनीती! स्टार खेळाडूंचे प्रत्येक वनडेत खेळणे आता शक्य नाही

On: मंगळवार, जुलै 14, 2026 11:19 AM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला मंगळवारपासून (१४ जुलै) सुरूवात होत आहे. याआधी भारताचे स्टार खेळाडू, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासमोर एक मोठे आव्हान आले आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेतील धक्कादायक पराभवानंतर दोन्ही अनुभवी खेळाडू भारतासाठी चांगली सुरूवात करतील अशी अपेक्षा आहे. या मालिकेला २०२७ वनडे विश्वचषकाच्या तयारीची सुरूवात असेही म्हणता येईल, मात्र त्याआधी एक मोठी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवा खेळाडूंना अधिक खेळण्याची संधी मिळावी यासाठी संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यासमोर रोहित आणि विराट या दोघांना आलटून-पालटून खेळवण्याचे आव्हान असणार आहे. गेल्या काही काळापासून संघ व्यवस्थापन आणि निवड समिती वरिष्ठ खेळाडूंना रोटेशन धोरणाबद्दल पटवून देण्याच्या प्रयत्नात आहे.

रोटेशन धोरणामुळे युवा खेळाडूंनाही सामन्यांच्या सरावासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. भारताला २०२७ च्या विश्वचषकापूर्वी जवळपास २० वनडे सामने खेळावे लागतील. जर भारताने हे धोरण लागू केले आणि वरिष्ठ खेळाडूंना आलटून-पालटून खेळवले, तर रोहित आणि विराट हे सर्व वनडे सामन्यांमध्ये खेळणार नाहीत.

संघ व्यवस्थापनाला अफगाणिस्तानविरुद्धच्या अंतिम वनडे सामन्यात रोहितला रोटेट करायचे होते, मात्र रोहितने विश्रांती घेण्यास नकार दिला. त्यामुळे यशस्वी जायस्वालसाठी जागा करण्यासाठी कर्णधार शुबमन गिल खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

अहवालानुसार, संघ व्यवस्थापनाला अशी परिस्थिती नको आहे, जेथे एखादा अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त होईल आणि त्याच्या जागी पुरेसा खेळण्याचा अनुभव असलेला कोणीही खेळाडू तयार नसेल. २०२७ च्या विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापन त्यांच्या योजनांमध्ये जायस्वालचा समावेश करण्याच्या विचारात आहे. तसेच त्यांना दुसऱ्या विकेटकीपर-फलंदाजाचाही पर्याय उपलब्ध ठेवायचा आहे.

यावरून रोहित आणि विराट यांच्याबरोबर केएल राहुललाही रोटेट केले जाण्याची शक्यता आहे. शेवटच्या वनडे सामन्यातही असेच घडले होते. राहुलला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्याऐवजी ईशान किशनकडे विकेटकीपरची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्याआधी गिलनेही या रोटेशन योजनाबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, “तुम्ही सामन्यात कधीही अस्थिर संघ उतरवू शकत नाही. त्यासाठी युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे. यामुळे गरजेच्या वेळी ते चांगली कामगिरी करू शकतील. २०२७ च्या विश्वचषकासाठी संघ सर्वोत्तम करण्यावर भर आहे. आम्हाला प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---