बंगळुरू। भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरू असून रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीत बंगळुरूच्या जस्ट क्रिकेट अकादमी ग्राऊंडवर बंगाल विरुद्ध झारखंड संघात सामना झाला. या सामन्यात बंगाल संघाने मोठा विश्वविक्रम रचला आहे.
या सामन्यात बंगालने पहिला डाव तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (८ जून) घोषित केला. त्यांनी या डावात २१८.४ षटके खेळताना ७ बाद ७७३ धावा केल्या. या डावादरम्यान बंगालकडून फलंदाजी केलेल्या सर्व ९ फलंदाजांनी ५० हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे मोठा विश्वविक्रम बंगालच्या नावावर झाला आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे की, एकाच डावात पहिल्या ९ फलंदाजांनी ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. बंगालकडून अभिषेक रमण (६१), अभिमन्यू इश्वरन (६५), सुदीप घरामी (१८६), अनुस्तुप मुजुमदार (११७), मनोज तिवारी (७३), शाहबाज अहमद (७८), सयन मंडोल (नाबाद ५३) आणि आकाश दीप (नाबाद ५३) यांनी ५० हून अधिक धावा केल्या.
यापूर्वी १८९३ साली ऑस्ट्रेलियन संघाकडून ऑर्सफोर्ड अँड कॅब्रिज युनिवर्सिटी पास्ट अँड प्रेझेंट संघाविरुद्ध ८ फलंदाजांनी ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या होत्या. हा विक्रम बंगालने मोडला आहे. (Bengal becomes the first team in FC cricket to have 9 batsmen registering fifty plus scores)
बंगालकडून आकाशदीपने १८ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूकडून झालेले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. त्याच्या त्याच्या नाबाद ५३ धावांच्या खेळीत तब्बल ८ षटकार मारले. तसेच घरामी आणि मुजुमदार यांनीही शानदार कामगिरी करताना शतकी खेळी केली.
दरम्यान, सुशांत शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच शाहबाज नदीमने २ विकेट्स आणि अनुकुल रॉय व राहुल शुक्लाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘कसोटीची डेब्यू कॅप मिळाली, मात्र एक खंत राहीलच’, मोहम्मद सिराज हळहळला
आयपीएलला मोठी करणारे पाच श्रीलंकन लिजेंड, यांच्याबद्दल जाणून घेतलंच पाहिजे
आज विराट नसता, तर ‘तो’ नक्कीच असता, वाचा सीएसकेच्या यशाच्या अनसंग हीरोबद्दल