येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान इंग्लंडच्या साउथॅम्प्टनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने २० सदस्यीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. या संघात भुवनेश्वर कुमार याला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता त्याला संघात स्थान न देण्यामागचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
भुवनेश्वरला स्वत: कसोटी क्रिकेट खेळायचे नसल्याने त्याची निवड केली गेली नसल्याचे सांगितले जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, भुवनेश्वरला आता क्रिकेटच्या मोठ्या स्वरुपात (कसोटी क्रिकेट) खेळण्याची इच्छा नाही. त्याच्या कसोटी क्रिकेट खेळण्याचा उत्साह राहिला नाही. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटपासून दूर जात मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्याच्या तयारीत आहे. याच कारणास्तव भारतीय संघ निवडकर्त्यांनी कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना आणि इंग्लंड दौऱ्यावर त्याची निवड न करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळण्याची शक्यता
गेले काही महिने, दुखापतीमुळे भुवनेश्वरचे भारतीय कसोटी संघात येणे जाणे सुरू होते. त्याने दुखापतीतून सावरल्यानंतर आल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी आणि सैयद मुश्ताक अली स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत संधी देण्यात आली होती. त्याने ३ वनडे सामन्यात ६ गडी बाद केले होते. त्यानंतर झालेल्या टी-२० मालिकेत त्याने ४ गडी बाद केले होते. तसेच एका सामन्यात त्याने अवघ्या १५ धावा देत २ गडी बाद केले होते.
भुवनेश्वरची कामगिरी पाहता त्याला श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जुलै महिन्यात हा दौरा असून होणार असून या दौऱ्यात ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जास्तीच बोट ऋतिककडे आहे, पण काड्या..’ विराटवर निशाणा साधणाऱ्या वॉनला भारतीय दिग्गजाची सणसणीत चपराक
सध्याचा खराब फॉर्म अन् इंग्लंडमधील चिंताजनक आकडेवारी, रहाणेला WTC Finalमध्ये जागा मिळणार का?
आयपीएल २०२१च्या उर्वरित हंगामावर टांगती तलवार? पाहा काय म्हणाले राजस्थान रॉयल्सचे संघमालक