---Advertisement---

IPL दरम्यान भुवनेश्वर कुमारचा मोठा खुलासा, सामना संपल्यानंतर खेळाडू काय बोलतात?

---Advertisement---

भारतीय क्रिकेट मधील स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमार सध्या आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये आरसीबीसाठी त्याच योगदान देत आहे. त्याने आताच एका इंटरव्यू दरम्यान त्याच्या करिअरच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या दरम्यान भुवनेश्वरने त्याची प्रेम कहाणी, पदार्पण आणि आयपीएल बद्दल खुलासा केला आहे. या खेळाडूने आयपीएलमध्ये खेळाडूंच्या त्यांच्यातील आपापसामध्ये बोलण्याबद्दल भाष्य केले आहे, ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.

आयपीएल 2025 चा अर्धा हंगाम संपलेला आहे . मजा मस्तीचे व्हिडिओ सर्वांनीच पाहिले आहेत. सामन्यादरम्यान काही खेळाडू एकमेकांसोबत बोलताना दिसून येतात. यावर भूवीने प्रतिक्रिया दिली आहे, त्याने अशा खेळाडूंना ऐकवले आहे आणि खुलासा केला आहे की, ते क्रिकेट बद्दल दोन मिनिट बोलत नाहीत. ते फक्त मजा मस्ती आणि गप्पा करत असतात.

भुवनेश्वरने बियर बायसेप्स यूट्यूब चैनल वर म्हटले, आम्ही ब्रेकच्या टाईममध्ये मजा मस्ती आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी करत असतो. त्यामध्ये क्रिकेटशी काहीही जोडलेले नसते. जर तुम्ही ते ऐकाल, तर तेव्हा म्हणाल की हे काय बोलत आहेत आणि का करत आहेत? जर क्रिकेट बद्दल बोलत असू आणि जर कोणी दहा मिनिट बोलत असेल तर ते फक्त क्रिकेटवर दोन मिनिटच बोलतात त्यापेक्षा जास्त नाही.

भुवी घरेलू क्रिकेटमध्ये त्याच योगदान सातत्याने देत आहे. त्याने आयपीएल 2025 मध्ये सुद्धा आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे, पण विकेट घेण्याच्या बाबतीत तो थोडासा मागे आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2022 मध्ये खेळला होता, त्यानंतर मागच्या तीन वर्षांपासून त्याची टीम इंडियामध्ये वापसी झाली नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---