आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाने धमाकेदार विजय मिळवला. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत केले. टीम इंडियाने आधीच स्पष्ट केले होते की ते एसीसी प्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. नकवी बराच वेळ पोडियमवर उभे राहिले, पण भारतीय खेळाडू कप घ्यायला गेले नाहीत. शेवटी नकवी स्वतःच ट्रॉफी घेऊन परत गेले आणि भारताने कोणत्याही ट्रॉफीशिवाय विजयाचा उत्सव साजरा केला.
आता मोठा प्रश्न असा आहे की टीम इंडियाने असे का केले? यामागे तीन मोठी कारणे आहेत.
मोहसिन नकवी यांनी यापूर्वी अनेकदा भारतविरोधी ट्विट केले आहेत. ते फक्त एससीचे प्रमुख नाहीत, तर पाकिस्तान सरकारमध्येही मोठ्या पदावर आहेत. या काही कारणांमुळेच टीम इंडियाने मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारली नाही. नकवी यांनी मनमानी करत ट्रॉफी स्वतःकडे ठेवली. याचाच तोटा आता त्यांना भोगावा लागू शकतो आणि येत्या काळात त्यांच्या विरोधात मोठे पाऊल उचलले जाऊ शकते. त्यांना एसीसी प्रमुखपदावरून काढून टाकले, तरी त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही.






