पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ही स्पर्धा शेवटची 2017 मध्ये खेळली गेली होती. जेव्हा पाकिस्तानने टीम इंडियाचा अंतिम फेरीत पराभव करून ट्रॉफीवर कब्जा केला होता. यावेळी पाकिस्तान गतविजेता म्हणून स्पर्धेत उतरणार आहे. मात्र, ही स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. या कारणास्तव, आयसीसी टूर्नामेंट इतर ठिकाणी हलवू शकते.
pcb-big-proposal-to-bcci-ensure-team-india-visits-pakistan-for-champions-trophy-2025
त्यासाठी पाकिस्तान अनेक दिवसांपासून बीसीसीआयला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. पण भारतीय क्रिकेट बोर्डाने आधीच स्पष्टपणे सांगितले आहे की ते भारत सरकारच्या परवानगीशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवणार नाहीत. दोन्ही देशांमधील संबंध अनेक वर्षांपासून खराब आहेत. भारत सरकार खेळाडूंच्या सुरक्षेबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.
दरम्यान, भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेबाबत पीसीबीने बीसीसीआयला मोठा प्रस्ताव दिला आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, पीसीबी आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करण्यास आणि टीम इंडियाचे पाकिस्तानमध्ये स्वागत करण्यास उत्सुक आहे. पीसीबीने बीसीसीआयला पत्र लिहून आश्वासन दिले आहे की जर भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धेदरम्यान पाकिस्तानमध्ये राहू इच्छित नसेल तर ते प्रत्येक सामन्यानंतर संघाला भारतात (चंदीगड किंवा दिल्ली) परतण्यासाठी मदत करतील.
आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या प्रस्तावावर बीसीसीआय काय प्रतिक्रिया देते हे पाहायचे आहे. बीसीसीआय आपल्या निर्णयावर ठाम राहील. अशी आशा आहे. यावर आयसीसीकडून काय प्रतिक्रिया येईल हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
या स्पर्धेचे बजेट आयसीसीने फार पूर्वीच मंजूर केल्याची माहिती आहे. पाकिस्तानमध्ये अनेक स्टेडियमचे नूतनीकरण केले जात आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. पीसीबीने या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच आयसीसीकडे पाठवले आहे. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
हेही वाचा-
Ranaji Trophy; ईशानचे शतक तर सुदर्शनचे द्विशतक, टीम इंडियामध्ये कधी मिळणार स्थान?
विराट कोहलीची शेवटच्या चेंडूवर मोठी चूक, रिव्ह्यू घेऊनही ठरला बाद!
ind vs nz; भारताचा पलटवार, रोहित-विराटसह, सर्फराजची शानदार खेळी, असा राहिला तिसरा दिवस