चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव याच्या कारकिर्दीत मागच्या २ वर्षांपासून सातत्याने घसरण झाली आहे. सध्याच्या फिरकीपटूंपेक्षा तो खूप मागे पडला आहे. तसेच तो दुखापतग्रस्त असल्यानेसुद्धा त्याला क्रिकेटपासून मुकावं लागतंय. संघ व्यवस्थापन सुद्धा त्याला संघातून सारखं वगळत आहेत. याबद्दल आता त्याचे प्रशिक्षक कपिल देव पांडे यांनी आपली मतं मांडली आहेत
कपिल देव पांडे (Kapil Dev Pandey) यांचं असं म्हणणं आहे की, या सगळ्याला कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याचा आत्मविश्वास कारणीभूत आहे. ते पुढे म्हणाले की, “माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षकांमुळे कुलदीपचा आत्मविश्वास गेला. तो जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये होता, तेव्हा त्याला संधी नाही देण्यात आली आणि त्याला नेहमी संघातून डच्चू देण्यात आला.”
सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ विकेट्स घेल्यानंतर त्याची २ वर्षे फार वाईट गेली. २०१९ मध्ये त्याला प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी परदेशात भारताचा नंबर १ फिरकीपटू म्हणून त्याला शाबासकी दिली होती. त्याने २३.८५ च्या सरासरीने २६ विकेट्स घेतल्या, तरी तो कसोटी संघात जागा नाही मिळवू शकला. त्यांनी कसोटीमध्ये अश्विन आणि जडेजालाच पसंती दिली.
यावर त्याचे प्रशिक्षक पांडे म्हणाले, “अश्विन आणि जडेजा खरंच उत्कृष्ट गोलंदाज आहेतच, पण कुलदीपला फॉर्ममध्ये असताना तेवढी संधी देण्यात नाही आली. मला वाटतं दुखापत होण्याअगोदर सुद्धा कुलदीप कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या आवडीचा खेळाडू नव्हता त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं.”
प्रशिक्षक आयएएनएसशी बोलताना म्हणाले, “काही जण बोलतात त्याच्या फॉर्ममुळे असं झालं. पण मला सांगा त्याला कितीवेळा खेळण्याची संधी मिळाली? तो विकेट्स तर नक्कीच घेत होता. कोणी ६ चेंडूत ६ विकेट्स तर नाही घेऊ शकत. असं वाटतं की तो कर्णधार आणि प्रशिक्षकांचा आवडता खेळाडू नसल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळेच त्याला जास्ती संधी नाही मिळू शकली.”
यादवला आयपीएलच्या १४ व्या हंगामात (IPL 14) त्याचा संघ कोलकाता नाईट रायडर्सने देखील (Kolkata Knight Riders) खेळवलं नाही. त्यांनी वरुण चक्रवर्थीला (Varun Chakravarthy) खेळवलं आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या मेगा लिलावासाठी (Mega Auction) कुलदीपला संघातून सोडण्यात आलं. दुखापतग्रस्त असल्यामुळे कुलदीप आयपीएल १४ च्या दुसऱ्या चरणात नाही खेळू शकला. तो तेव्हापासूनच क्रिकेटपासून दूर आहे. सुटतो नियमित सराव करत आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये (National Cricket Academy) प्रशिक्षण घेऊन लवकर पुनरागमन करेल अशी आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-