यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला आहे. या विजयाने भारतीय संघ टी20 विश्वचषक 2024 च्या सेमी फायनल मध्ये धडक मारली. आता भारताचा दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 27 जून रोजी इंग्लंड विरुद्ध सामना होईल.तर या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघ मात्र गोत्यात आला आहे. जर अफगाणिस्तानने बांग्लादेश विरुद्धचा सामना जिंकल्या कांगारुंचा यंदाच्या विश्वचषकातून पत्ता कट होऊ शकते.
तत्पूर्वी सामन्यात मिचेल मार्शने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने रोहित शर्माच्या 41 चेंडूत 92 धावांची झंझावाती खेळी आणि हार्दिक पांड्या शिवम दुबे यांच्या मोलाच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 206 धावांचा विशाल लक्ष्य कांगारुसमोर ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्ट्रार्क आणि मार्कस स्टॉइनिस यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात उतरला तेव्हा ट्रॅव्हिस हेड एका टोकाकडून खंबीरपणे उभा राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ मिळू शकली नाही. हेडने 43 चेंडूत 76 धावा केल्या, पण ऑस्ट्रेलियाचे बोट विजयापर्यंत खेचू शकले नाही. अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी मोलाचे योगदान दिले. कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये येऊन 2 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंगने 3 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर टी20 विश्वचषक 2024 च्या सेमी फायनल साठी तिसरा संघ ठरला आहे. या आधी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघ पात्र ठरले आहेत. तर सेमीफायनल 2 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामना 27 जून रोजी होणार आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार आहे. जर सुपर-8 मधील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताने बांग्लादेशला मात दिल्यास ऑस्ट्रेलिया यंदाच्या विश्वचषकातून बाहेर होऊ शकते.
महत्तवाच्या बातम्या-
ब्रेकिंग न्यूज! बीसीसीआयकडून आगामी झिम्बाब्वे दाैर्यासाठी भारतीय संघाची घोषणा!
वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर! जाणून घ्या दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाची 3 मोठी कारणे
निर्णायक सामन्यात भारतीय संघास ‘या’ खेळाडूंपासून राहवं लागेल सावध, अन्यथा पुन्हा पदरी निराशाच!