भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. यादरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. अशात आशा व्यक्त केली जात आहे की, फलंदाज जितेश शर्मा याला यादरम्यान आंतरराष्ट्रीय टी20 संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. जितेशने यावेळी टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेपूर्वी युवा खेळाडूंना संधी देण्याविषयी मोठे भाष्य केले आहे.
जितेश शर्मा (Jitesh Sharma) हा आयपीएल (IPL) स्पर्धेत पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून खेळतो. त्याने मागील दोन्ही हंगामात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने संघाला गरज पडेल, तेव्हा फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. याची भारतीय संघाला नितांत आवश्यकता आहे.
स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत जितेशने सांगितले की, वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिका किती महत्त्वाची असणार आहे. कारण, टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) याच परिस्थितीत खेळला जाणार आहे. तो म्हणाला की, “माझा विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व कराल, तेव्हा जवळपास दीड वर्षांपूर्वीच विश्वचषकाची तयारी सुरू करू शकता. 2024 टी20 विश्वचषकाचे आयोजन वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. माझा विश्वास आहे की, विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंना पारखण्याची ही योग्य वेळ आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “त्या खेळाडूंसाठी वेस्ट इंडिजच्या परिस्थितीला समजण्यात मदत मिळेल आणि जाणवेल की, तिथे खेळपट्टी कशाप्रकारे काम करते. अशात ते तेथील परिस्थितीच्या हिशोबाने प्रदर्शन करू शकतील. यामुळे त्यांना टी20 विश्वचषकात खेळताना मदत मिळेल.”
जितेशने यावेळी असेही सांगितले की, तो त्याच्या खेळाच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष देत आहे. तो विदर्भासाठी खेळतोय की, आयपीएल फ्रँचायझीसाठी याने त्याला फरक नाही पडत. तो म्हणाला की, “माझा विश्वास आहे की, कोणत्याही खेळाडूसाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शारीरिकरीत्या फिट राहणे, मानसिकरीत्या स्वस्थ राहणे आणि शैलीनुसार नेहमीच तयार राहणे. मी या तीन गोष्टींवर लक्ष देतो. जर तुम्ही या गोष्टींवर लक्ष दिले, तर तुम्ही कोणत्या क्रिकेट प्रकारात खेळता, त्याने फरक पडत नाही. तुम्ही मानसिकरीत्या स्वत:ला जुळवून घेऊ शकता.”
तो पुढे असे म्हणाला की, “मला वाटते की, कोणताही क्रिकेट प्रकार असो, तुम्ही सहजरीत्या खेळू शकता. माझ्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. कारण, मला वाटते की, क्रिकेटपटू म्हणून आम्ही भाग्यवान आहोत की, व्यावसायिक क्रिकेट खेळत आहोत.”
जितेशची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात त्याने 14 सामन्यात फलंदाजी करताना 23.77च्या सरासरीने 309 धावा केल्या होत्या. यामध्ये नाबाद 49 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. तसेच, 2022 हंगामात त्याने 12 सामन्यात 234 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे त्याने एकूण दोन हंगामात 26 सामन्यात 25.86च्या सरासरीने आणि 159.24च्या स्ट्राईक रेटने 543 धावा केल्या आहेत. (cricketer jitesh sharma ahead west indies t20is says best time test players t20 world cup 2024)
महत्वाच्या बातम्या-
बापरे! अजित आगरकरला वर्षाकाठी मिळणार ‘एवढे’ कोटी रुपये, BCCIकडून मुख्य निवडकर्त्याच्या पगारात 3 पटींनी वाढ
अरेरे! विजय शंकरचा संघ TNPL स्पर्धेतून OUT, ‘या’ 4 संघांनी मिळवला प्ले-ऑफमध्ये एन्ट्री करण्याचा मान