भारतीय खेळाडूंनी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रिकेटप्रेमींची चांगलीच निराशा केली. रविवारी (दि. 11 जून) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा 209 धावांनी पराभव झाला. यादरम्यान विस्फोटक फलंदाज विराट कोहली यालाही मोठी खेळी उभारता आली नाही. स्टीव्ह स्मिथ विराट कोहली याचा झेल घेऊन हिरो ठरला. स्मिथने हवेत उडी मारत विराटचा लाजवाब झेल पकडून 140 कोटी भारतीयांच्या आशेवर पाणी फेरले. त्याचा व्हिडिओ आयसीसीनेही शेअर केला आहे.
स्मिथचा अफलातून झेल
भारताच्या पहिल्या डावात 14 धावा करणारा विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या डावात 49 धावा करून तंबूत परतला. विराटने स्कॉट बोलँड (Scott Boland) याच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूशी छेडछाड करून दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या हातात झेल दिला. यावेळी स्मिथने हवेत झेप घेत शानदार झेल पकडला. स्मिथने झेल पकडताच ऑस्ट्रेलिया संघाने एकच जल्लोष केला. संघाला संकटात सोडून परतल्याची निराशा विराटच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. विराटची मान खाली पडली होती, तो इकडे-तिकडे न पाहता तंबूत परतला.
https://www.instagram.com/p/CtWJ9b1LUe2/
जडेजानेही केले निराश
विराट कोहली तंबूत जाऊन अद्याप एक चेंडूही झाला नव्हता, तेवढ्यात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यानेही भारताला बुडत्या जहाजेत एकटे सोडले. जडेजाला बोलँडने एकही धाव काढू दिली नाही. तो दुसऱ्याच चेंडूवर यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरे याच्या हातून झेलबाद झाला.
पुजाराही फ्लॉप
इंग्लंडमध्ये दीर्घ काळापासून काऊंटी क्रिकेटचा भाग राहिलेल्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात फ्लॉप ठरला. पुजारा खूपच खराब शॉट खेळून तंबूत परतला. तसेच, कर्णधार रोहित शर्मा याने चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलला नाही आणि 43 धावा करून नेथन लायनच्या चेंडूवर बाद झाला. दुसरीकडे, सलामीवीर शुबमन गिल तिसऱ्या पंचांच्या वादग्रस्त निर्णयाचा शिकार झाला. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ फक्त 234 धावाच करू शकला. त्यामुळे भारताला 209 धावांनी लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. (cricketer steve smith took brilliant catch of virat kohli in 2nd slip in wtc final 2023 see video)
महत्वाच्या बातम्या-
“रोहितच्या नेतृत्वात आपण आयसीसी ट्रॉफी नाही जिंकू शकत”, माजी प्रशिक्षकाचे परखड मत
भारताच्या पराभवामागील खरे व्हिलन ‘हे’ 2 खेळाडू! नेटकरीही म्हणाले, ‘बीसीसीआयने त्यांना घेतलंच कशाला?’