30 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियातून क्रिकेट जगतातून अत्यंत दु:खद बातमी आली. 17 वर्षीय बेन ऑस्टिन याचा चेंडू मानेला लागल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या (ब्लॅक बॅण्ड) बांधून खेळ केला. आज मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघांनीदेखील ब्लॅक बॅण्ड घालून मैदानात प्रवेश केला. तसेच सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी बेन ऑस्टिन यांना श्रद्धांजली अर्पण केली.
लोकल टी-20 सामन्यापूर्वी ऑस्टिन नेट्समध्ये साइड आर्म गोलंदाजीविरुद्ध सराव करत होते. त्याच वेळी चेंडू त्यांच्या मानेवर लागला. त्यामुळे ते मैदानावर कोसळले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. काही दिवस उपचार सुरू असतानाच 30 ऑक्टोबरच्या सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आता मेलबर्न टी-20 सामन्यापूर्वी सर्वांनी मौन पाळून या तरुण खेळाडूला श्रद्धांजली वाहिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मैदानावर ऑस्टिनची कॅप ठेवून त्यांना आदरांजली दिली. यापूर्वीही ऑस्ट्रेलियाने अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय खेळाडू फिल ह्यूज यांना गमावले होते.
सलग टॉस हरल्यानंतर टीम इंडियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बातमी लिहिल्या जाण्याच्या वेळेपर्यंत भारताने 14 षटकांत 5 गडी गमावून 96 धावा केल्या होत्या. सलामीवीर अभिषेक शर्मा 27 चेंडूत 52 धावा करत खेळत आहेत, तर स्टार ऑलराउंडर हर्षित राणा 25 चेंडूत 26 धावांवर खेळत आहेत. शुभमन गिल, संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव बॅटने पूर्णपणे अपयशी ठरले. एशिया कप 2025 च्या अंतिम सामन्याचा हिरो तिलक वर्मा तर आपले खातेही उघडू शकला नाही. शिवम दुबे आणि अक्षर पटेलदेखील निराशाजनक कामगिरी करत परतले.






