भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. सामन्यातील पहिला दिवस इंग्लंडच्या संघासाठी चांगला ठरला आहे. इंग्लंडने पहिल्या दिवशी भारताला ७८ धावांवर सर्वबाद केले आहे. जेम्स अंडरसनने ३ विकेट घेतल्या आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर आनंदही व्यक्त केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हसीब हमीद आणि रोरी बर्न्स या दोघांनी अर्धशतक केले. इंग्लंडने पहिला दिवस संपेपर्यंत १२० धावा केल्या आणि भारतावर ४२ धावांची आघाडी घेतली आहे. यानंतर अंडरसनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अंडरसन बोलताना म्हणाला, “यापेक्षा चांगले आणखी काय होऊ शकते. आम्ही नाणेफेक हारली आणि त्यानंतर गोलंदाजी करताना अप्रतिम प्रदर्शन केले. ज्याप्रकारे दोन्ही खेळाडूंनी (हमीद आणि बर्न्स) दिवसाचा शेवट केला, ते अप्रतिम होते. चेंडू आणि बॅटने आम्ही तेच दाखवले, जे आम्हाला करायचे होते. हा दिवस खूप वेळा येत नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त खुश राहायचे आहे.”
लार्ड्सवरील दुसरा सामना हारल्यानंतर इंग्लंड कसोटी मालिकेत ०-१ ने मागे आहे. असे असले तरी आता अंडरसनने लीड्सवरच्या तिसऱ्या कसोटीतील चांगल्या गोलंदाजीमुळे आनंद व्यक्त केला आहे. तो पुढे बोलताना म्हणाला. “ज्याप्रकारे सर्व गोलंदाजांनी विकेटसोबत ताळमेळ बसवला आणि ज्याप्रकारे आम्ही गोलंदाजी केली, ते अप्रतिम आहे. आम्ही एक संघाच्या रूपात गोलंदाजी करण्याचे ठरवले होते आणि आज अगदी तसेच केले.”
अंडरसन पुढे बोलताना म्हणाला, “मी हमीदसाठी आनंदी आहे. त्याने कसोटी सेट-अपमध्ये पुनरागमन केले आहे. तुम्ही पाहू शकता की त्याने त्याच्या खेळावर किती काम केले आहे, तो कसा एक चांगला खेळाडू बनला आहे. एक गोष्ट जी त्याच्याजवळ नेहमीपासून राहिलेली आहे, ती आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य स्वभाव आणि हे आपण आज पाहिले आहे. तो शांतीत त्याच्या डावाला पुढे घेऊन जात होता. त्याच्याकडे एक गेम प्लॅन होता, ज्याला त्याने आप्रतिम प्रकारे अंमलात आणले आहे. त्याला अशाप्रकारे खेळताना पाहणे आमच्यासाठी असे नाहीये, ज्याला पाहून आम्ही आम्हाला आच्छर्य होईल. प्रत्येकजण त्याच्या या खेळामुळे आनंदी आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय पदार्पणात गांगुली, द्रविडची विकेट घेणाऱ्या अंपायरचा लीड्स सामन्यातून कसोटीत ‘डेब्यू’
‘टेस्ट स्पेशलिस्ट’ पुजाराच्या फलंदाजीला गंज, माजी क्रिकेटरने दिला ‘हा’ बहुमुल्य सल्ला
इंग्लंडला डिवचणे भारताला भोवले; दिग्गज म्हणाले, ‘कोहलीने आपला अहंकार खिशात ठेवावा’