भारत आणि इंग्लंड यांच्यत तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघ केवळ ७८ धावांवर सर्वबाद झाला. भारताचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा मोठी धावसंख्या करू शकला नाही. त्याने या सामन्यात केवळ ७ धाव केल्या.
तिसरा सामना सुरू होण्याआधी कोहली माध्यमांशी बोलताना म्हटला होता की, इंग्लंडमध्ये फलंदाजांना त्यांचा अहंकार खिशात ठेवावा लागतो. मात्र, त्याने केलेले हे वक्तव्य त्यालाच अंमलात आणण्याची गरज तिसऱ्या सामन्यात दिसली. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू मनिंदर सिंगने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
लीड्सवरील तिसऱ्या सामन्यात कर्णधार विराट आणि भारतीय संघ त्याच चुका पुन्हा-पुन्हा करत राहिला. त्यांच्या खेळात दुसऱ्या सामन्यातील विजयानंतरचा अहंकार दिसत होता. परिणामी भारतीय संघाचा सामन्यातील पहिला डाव इंग्लंडने ७८ धावांवर गुंडाळला.
तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीच्या भारताच्या प्रदर्शनाबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू मनिंदर सिंगने माध्यमांशी बोलताना त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्याच्या प्रतिक्रियेत कर्णधार कोहलीला एक मोलाचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला, “कसोटी सामन्याच्या आधी विराट कोहलीने म्हटले होते की, या इंग्लंडच्या परिस्थितींमध्ये तुम्हाला तुमचा अहंकार तुमच्या खिशात ठेवावा लागेल. मला वाटते हे अगदी योग्य आहे.”
तो पुढे बोलताना म्हणाला, “जर इंग्लंडने वर्चस्व करण्याचा प्रयत्न केला, जसे विराट नेहमी करतो. ही अशा प्रकारची खेळपट्टी नाहीये, जेथे ते अशा प्रकारची फलंदाजी केली जाऊ शकते. विराटला खेळपट्टीवर काही वेळ घालवण्याची गरज आहे, जसे त्याने मागच्या दौऱ्यावर केले होते. तिथे त्याने जवळपास ६०० धावा केल्या होत्या. एकदा जर तुम्हाला गती माहित असेल आणि माहित असेल की, चेंडू किती फिरत आहे. तर तुम्ही तुमचे शाॅट खेळणे चालू ठेवू शकता. ही सपाट भारतीय खेळपट्टी नाहीये, जेथे तुम्ही तुमचा पाय पुढे करून ड्राईव्ह करायला सुरुवात करू शकता. कोहलीने जे सांगितले ते अंमलात आणावे लागेल. तुमचा अहंकार तुमच्या खिशात ठेवा.”
महत्त्वाच्या बातम्या-
लीड्स कसोटीत फलंदाजी करतेवेळी पंतकडून झाली ‘ही’ चूक, पंचांनी वेळीच दिला इशारा
रोहितमुळे भारताच्या नावे लाजिरवाणा विक्रम! १ धाव जास्त केली असती तर झाला नसता ‘नकोसा’ विक्रम
भारत ७८ वर ऑल आऊट, चिंता नको! ही बातमी वाचून भारतीय चाहत्यांच्या जिवात जीव येईल