भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wo t20 series) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना रविवारी (२० फेब्रुवारी) पार पडला. भारताने या सामन्यात १७ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेतील एकही सामना न गमावता मालिका नावावर केली. शेवटच्या टी२० सामन्यातून युवा वेगवान गोलंदाज आवेश खान (avesh khan) याला भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिल्यांदाच निवड झाल्यानंतर आवेश खानचे वडिल आशिक खान यांच्याशी माध्यमांनी चर्चा केली. यावेळी आवेशला भारतासाठी पदार्पणाची संधी मिळाली, याची त्याच्या वडिलांना कसलीच कल्पना नसल्याचे समोर आले.
अमर उजालाने त्याच्या वडिलांना प्रश्न विचारला की, आवेश खानला पदार्पणाची संधी मिळाली आहे, यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ? या प्रश्नावर उत्तर देताना आवेशचे वडील म्हणाले की, “काय, आवेशला पदार्पणाची संधी मिळाली आहे. हे खरं आहे का? जर हे खरं असेल, तर खूप आनंदाची गोष्ट आहे. मला तर माहितीच नाही. मी सध्या बाजारात आहे. पदार्पणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. तुम्हीच ही बातमी दिली आहे. मी घरातून बाहेर आहे. खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत आहे. पदार्पणाला उशीर झाला, पण हेच आयुष्य आहे. संघात यापूर्वीही त्याची निवड झाली होती. पण आम्ही सर्वजण त्याच्या पहिल्या सामन्याची आम्ही वाट पाहत होतो.”
हेही वाचा- T20 Series: वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप करत कर्णधार रोहितने विराटला केले ओव्हरटेक, बनला ‘नंबर १’
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात आवेश खानला लखनऊ सुपर जायंट्सने तब्बल १० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. या संदर्भात प्रश्न विचारला गेल्यावर त्याचे वडील म्हणाले की, “अपेक्षेपेक्षा जास्त मोठी बोली लागली. मला पाच सहा कोटींची अपेक्षा होती. लिलावात तो विकला गेल्यानंतर आम्हाला खूप आनंदा झाला होता. आता भारताच्या प्लोइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यानंतर घरात जल्लोषाचे वातावरन आहे.”
आवेश खानच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या २७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १०० विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए मध्ये त्याने खेळलेल्या २२ सामन्यांमध्ये त्यानो १७ आणि टी-२० मद्ये ४८ सामन्यांमध्ये ६५ विकेट्स घेतल्या आहेत. भारताच्या १९ वर्षाखालील संघाव्यतिरिक्त तो भारत-ए, मध्य प्रदेश, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या संघासंसाठी खेळला आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आयपीएलमध्ये खेळलेल्या २५ सामन्यांमध्ये आवेशने २९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्माने स्टाईलमध्ये अंपायर बिली बाउडेनलाही टाकले मागे, DRS मागतानाचा Video तुफान व्हायरल
ईडन गार्डन्सवर तळपला भारताचा ‘सूर्या’! वादळी खेळीसह केली सर्वोत्तम कामगिरी
पुजाराची धुव्वादार खेळी आणि १०व्या विकेटसाठीची अभेद्य भागीदारी, सौराष्ट्रने मुंबईविरुद्ध टाळला पराभव